शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कोल्हापूर-गगनबावडा रोडवरील अपघातातून बचावलेल्या नाट्यदिग्दर्शकाने सांगितली घटनास्थळावरील कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 12:18 IST

भीषण अपघातातून वाचलेल्या सांगलीतील नाट्यदिग्दर्शक यशोधन गडकरी यांनी घटनास्थळी नेमकं काय घडलं? याबद्दलची कथा सांगितली आहे.

कोल्हापूर- गगनबावडा रोडवरील लेंघे गावाजवळ एका बसला अचानक आग लागली आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. बस चालकाच्या प्रसंगावधानानं इतर 18 प्रवाशांचा जीव बचावला आहे. या भीषण अपघातातून वाचलेल्या सांगलीतील नाट्यदिग्दर्शक यशोधन गडकरी यांनी घटनास्थळी नेमकं काय घडलं? याबद्दलची कथा सांगितली आहे. यशोधन गडकरी हे गोव्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून परतत असताना अपघात झालेल्या बसने प्रवास करत होते.

23 नोव्हेंबरच्या संध्याकाळी इफ्फीतून सिनेमा पाहून निघाले होते. सांगलीत होणाऱ्या राज्यनाट्य स्पर्धेतील नाटकासाठी ते इफ्फीतून काल संध्याकाळी निघाले होते. पणजी बसस्टॅण्डवर आल्यावर त्यांची शेवटची म्हणजेच साडेनऊ वाजता असणारी बस चुकली. त्यानंतर त्यांनी खाजगी बसने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. पणजीत असणाऱ्या त्या बसमध्ये फक्त एकच सीट शिल्लक होती. बसमधील पॅसेज अत्यंत कमी होता त्यामुळे आपातकालीन परिस्थितीत कसा होणार? असा विचारही त्यांच्या डोक्यात आला. ती बस प्रवाशांना जेवणासाठी कुठेही थांबवणार नव्हती त्यामुळे यशोधन यांनी शौचालयाला जायचं खोटं कारण सांगून ते म्हापसामध्ये उतरले आणि ऑम्लेट घेऊन ते पुन्हा गाडीत आले. गाडीमध्ये ऑम्लेट खाल्ल्यानंतर त्यांनी झोपण्याचं ठरवलं. पण झोप लागल नव्हती. गाडी म्हापसावरून पुढे गेल्यावर दोन वृद्ध स्त्रीया गाडीमध्ये चढल्या. रात्री दीड-दोन वाजेच्या सुमारास त्यांना झोप लागली. झोप लागत असताना त्यांना झोपेत काहीतरी जळल्याचा वास आला, नाका-तोंडातही धूर गेला होता. डोळे उघडल्यावर संपूर्ण बसमध्ये धूर पसरलेला दिसला. 

बसमध्ये नेमकं काय घडतंय हे समजायचा आधीच यशोधन यांनी बसमधून बाहेर पडायची धडपड केली. बसच्या एक्झिटकडे पाहिल्यावर फक्त धूर दिसत होता. त्याच धुरात एका मानवी आकृतीने उडी घेऊन जीवाच्या आकांताने पळ काढला. त्यावेळी बसला आग लागल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यशोधन यांनी लगेचच शूज, चष्मा व त्यांची बॅग सावरत बसमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. बसच्या दरवाजातून बाहेर उडी मारून रस्त्याच्या शेजारी असलेल्या शेतात धावलो व तेथे असलेल्या एका मंदिराचा सहारा घेतला. 

ड्रायव्हर-क्लिनरने प्रयत्न करूनही बसने पेट घेतला. घटनास्थळावरून हाका,गोंगाट, काचा फोडण्याचे आवाज ऐकु येत होते. बसमधून उड्या मारल्याने अनेकांना जखमा झाल्या होत्या.  मंदिरामागे यशोधन यांच्यासोबत इतर चार-पाच जण होती. त्यांनी  अंधाराच शेतातून गाडीच्या विरूध्द रस्त्याच्या उंचवट्याकडे गेले. १०-१५ मीटर पुढे अंधारात गेल्यावर समजलं. सर्वात मागे माझ्याच बाजूची चार तरूण पोरं आत अडकल्याचं समजलं.  पण एव्हाना गाडीने पूर्ण पेट घेतला होता. आता मागील फोडलेल्या काचांमधून दोघांनी बाहेर उड्या घेतल्या. २०-२५ मिनिटात गाडीचा फक्त सांगाडा दिसू लागला. या भीषण आगीत यशोधन यांच्या बाजूला असणाऱ्या दोघांना होरपळून मृत्यू झाला. बसला लागलेल्या भीषण आगीतून 14-15 जण सुखरूप वाचले.  

टॅग्स :Accidentअपघातfireआगkolhapurकोल्हापूर