शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

संपामुळे एसटीचे आतापर्यंत 605 कोटींचे नुकसान - अनिल परब

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 09:25 IST

Anil Parab :  एसटी संपादरम्यान पाच एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, या मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचे निर्देश महामंडळाला देण्यात आले आहेत. यासंदर्भात छाननी सुरू आहे. 

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे महामंडळाचे ६०५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमवारी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन अदा करून त्यांची वैद्यकीय देयके निकाली काढण्याबाबत तारांकित प्रश्न भाजपचे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विचारला होता. यावेळी झालेल्या चर्चेत शशिकांत शिंदे, परिणय फुके, गोपीचंद पडळकर यांनी उपप्रश्न विचारले.

या प्रश्नांवर परब म्हणाले की, संपामुळे महामंडळाचे ६०५ कोटींचे नुकसान झाले आहे. शिवाय, संपामुळे सामान्य जनता यामुळे वेठीस धरली गेली. कामावर परत येण्याचे वारंवार आवाहन करूनही अनेक कर्मचारी कामावर परतले नाहीत. निलंबनाची कारवाई मागे घेण्याचे आश्वासन देऊनही कामावर परतले नव्हते. त्यामुळे  बडतर्फ कामगारांच्या बडतर्फीचा निर्णय ताबडतोब मागे घेता येणार नाही.  

या कामगारांना कामावर परतण्यासाठी अनेक संधी दिल्या. त्यामुळे एसटी पूर्णपणे क्षमतेने सुरू झाल्यानंतरच याबाबत विचार करता येईल, असेही ते म्हणाले. एसटी संपादरम्यान पाच एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, या मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचे निर्देश महामंडळाला देण्यात आले आहेत. यासंदर्भात छाननी सुरू आहे. 

‘कामगारांनी अफवांना बळी पडू नये’कामगारांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याचा कोणताही ठराव झालेला नाही, असे परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली असून, देशातील कोणत्याही राज्यात मिळणाऱ्या पगाराएवढा पगार आता या कर्मचाऱ्यांना मिळत आहे. पगार दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत नियमित जमा होईल याची हमी सुद्धा राज्य शासनाने घेतली आहे, अशी माहितीही मंत्री परब यांनी दिली.विलिनीकरण संदर्भात त्रिसदस्यीय समितीचा जो काही अहवाल येईल तो राज्य सरकार मान्य करेल. तोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात राज्य सरकारने भरीव वाढ करूनही एसटी कामगारांचा संप सुरू असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. अफवांचे बाजार उठवून हा संप भडकवला जात आहे, कामगारांनी अफवांना बळी पडू नये, असे आवाहनही मंत्री परब यांनी यावेळी केले.

टॅग्स :Anil Parabअनिल परबMaharashtraमहाराष्ट्रvidhan sabhaविधानसभा