शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

५० आमदार वेगळी भूमिका घेतात तेव्हा...; एकनाथ शिंदे यांच्याकडून बंडखोरीच्या निर्णयाची पाठराखण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 06:57 IST

राजभवन येथील पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे आगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील असे सांगत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

५० आमदार वेगळी भूमिका घेतात म्हणजे आत्मपरीक्षणाची गरज आहे. आजकाल नगरसेवकही असे पाऊल उचलत नाहीत. तीन-चार वेळा उद्धव ठाकरे यांच्यासमोर अडचणी मांडण्याचा प्रयत्न केला. पण, त्यात यश मिळाले नाही, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी आपल्या निर्णयाची पाठराखण केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवत बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय घेतल्याचेही शिंदे म्हणाले.

राजभवन येथील पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे आगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील असे सांगत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. यानंतर माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की, स्वत:कडे १२० आमदारांचे संख्याबळ असताना फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले. फडणवीसांसारखी माणसे राजकारणात दुर्मीळ असल्याचे शिंदे म्हणाले.

...अन् फडणवीसांकडून आश्चर्याचा धक्का -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार गेल्यावर पर्यायी सरकार देण्याची आवश्यकता आहे. सरकार पडले तर पर्याय देऊ असे सांगितले होते. लोकांच्या डोक्यावर निवडणूक लादणार नाही. 

भाजप आणि शिवसेना विधिमंडळ पक्षासह छोटे पक्ष, अपक्षांच्या पाठिंब्याचे पत्र आम्ही राज्यपालांना दिले आहे. एकनाथ शिंदे यांना आम्ही समर्थन दिले आहे. ते मुख्यमंत्री बनतील. साडेसात वाजता एकनाथ शिंदे शपथ घेतील. त्यानंतर पुढील कार्यवाही करून विस्तारात शिंदे यांच्यासोबत असलेले शिवसेना आमदार, भाजपचे आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील, असे सांगत फडणवीस यांनी सर्वांनाच आश्चर्यचकीत केले. 

नेकं काय म्हणाले शिंदे --  राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.-  महाराष्ट्रात एक मजबूत सरकार दिसेल. बाळासाहेबांचे हिंदुत्व, मतदारसंघातील कामे आणि राज्याचा विकास हाच आमचा अजेंडा आहे.-  एकीकडे सत्ता पक्ष, मोठे-मोठे नेते आणि दुसरीकडे माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता. अशावेळी या सर्व सहकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास दाखविला. याच ताकदीने इतिहास घडविला. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. -  पूर्वीच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही.-  भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचेही आभार. महाविकास आघाडीमुळे अनेक निर्णय घेता येत नव्हते.

नेमकं काय म्हणाले फडणवीस --  हिंदुत्वाचा, सावरकरांचा होणारा अपमान, शिवसेना आमदारांची होणारी कुचंबणा, ज्यांच्याशी मागील निवडणुकीत लढलो आणि पुढेही लढावे लागणार आहे, -  मतदारसंघात ज्यांना पराभूत केले त्यांनाच निधी मिळत असेल तर लढायचे कसे, असा बंडखोर आमदारांचा प्रश्न होता. -  मविआ तोडा, अशी मागणी शिवसेना आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे ऐकणे पसंत केले. त्यांची कास धरली. -  भाजप-शिवसेनेला सत्तेचा जनादेश दिला होता. दुर्दैवाने तेंव्हाच्या आमच्या मित्राने वेगळा निर्णय घेतला. बाळासाहेबांनी ज्यांना विरोध केला त्या काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेत सरकार बनविले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा