शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरातील ३५० निरीक्षक बढतीच्या प्रतीक्षेत; निवृत्ती जवळ येऊनही पदोन्नती मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 02:53 IST

१९८९ च्या तुकडीतील अधिकाऱ्यांची संख्या मोठी

जितेंद्र कालेकर ठाणे : राज्य शासनाच्या उदासीन आणि वेळकाढू धोरणामुळे ठाणे-मुंबईसह राज्यभरातील तब्बल ३५० वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनेक वर्षांपासून उपअधीक्षकपदावरील बढतीच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये १९८९-९० च्या तुकडीतील अधिकाऱ्यांची संख्या मोठी आहे. यातील अनेक अधिकारी निवृत्त झाले. त्यामुळे किमान निवृत्तीपूर्वी तरी पदोन्नती व्हावी, अशी अपेक्षा या अधिकाºयांनी व्यक्त केली आहे.

सध्या ठाणे शहर, ग्रामीण आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ निरीक्षकांची संख्या ५० ते ६० च्या घरात असून राज्यभरात ही संख्या ३५० च्या घरात आहे. पोलीस सेवेत ३० वर्षे सेवा बजावूनही अनेकांना पदोन्नती मिळालेली नाही. संपूर्ण महाराष्टÑात अधिकारी हे उपअधीक्षकपदाच्या बढतीकडे डोळे लावून बसले आहेत. सरळ सेवा पद्धतीने उपनिरीक्षकपदी रुजू झालेले १९८९-९० च्या तुकडीतील १२५ तर १९९०-९१ च्या तुकडीतील सुमारे ७० अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. अधिकाºयांना निरीक्षक या एकाच पदावर १२ ते १४ वर्षांचा कालावधी उलटला आहे. निवृत्तीपूर्वी या वरिष्ठ निरीक्षकांना पदोन्नती द्यावी, याकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख तसेच पोलीस महासंचालकांनी याकडे लक्ष द्यावे, अशी या अधिकाºयांची मागणी आहे.उपअधीक्षकपदाच्या ३५० जागा रिक्त : सलग १० वर्षे एकाच पदावर सेवा बजावल्यानंतर पदोन्नती दिली जाते. राज्यभरातील शेकडो निरीक्षकांची सेवा १२ वर्षांपेक्षा अधिक झाली आहे. पंजाब आणि हरयाणा या राज्यांमध्ये तर उपनिरीक्षकपदावरील अधिकारी निवृत्तीपर्यंत थेट अधीक्षकपदापर्यंतची मजल गाठतो. महाराष्ट्रात सध्या उपअधीक्षकपदाच्या ३५० जागा रिक्त आहेत. अशा वेळी किमान उपअधीक्षकपदाची तरी पदोन्नती देण्यासाठी राज्य शासनाने कार्यवाही करावी, असेही एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Policeपोलिस