शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

राज्यातील १३ साखर कारखान्यांचा हंगाम आटोपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 12:13 IST

ऊस नसल्याचे कारण; राज्यात ४५६ लाख क्विंटल साखरेचे झाले उत्पादन

ठळक मुद्देदरवर्षी राज्यात प्रथम क्रमांकावर असलेला सोलापूर जिल्हा ५२ लाख गाळप करुन तिसºया क्रमांकावर कोल्हापूर जिल्हा ९५ लाख ५७ हजार मे. टन गाळप करुन प्रथम क्रमांकावरमराठवाड्यातील केवळ जालना व बीड या दोन जिल्ह्यातील गाळप ८ लाखांपेक्षा अधिक झाले

सोलापूर :  यंदा ऊस गाळप हंगामावर कमालीचा परिणाम होईल असे दिसत असून सुरू झालेल्या १४३ पैकी १३ कारखान्यांचा पट्टा पडला आहे. कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली वगळता अन्य जिल्ह्यातील गाळप हंगाम मार्चच्या पहिल्या आठवड्यात आटोपला जाईल असे सांगण्यात आले.

मागील वर्षी राज्यात पाण्याची मोठी तीव्रता होती. जानेवारीपासून १० आॅगस्टपर्यंतचा कालावधी  हा कडक उन्हाचा होता. यामुळे  उसासह सर्वच पिके करपली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील   ऊस क्षेत्र उन्हाच्या तडाख्यातून वाचले होते; मात्र पुरामुळे  नुकसान झाले होते. सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यातील पाण्याचा पट्टा वगळता अन्य ठिकाणचा ऊस जळाला होता. यामुळे यावर्षी अनेक साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला नाही.

कोल्हापूर, पुणे व  सोलापूर विभागातील ९० कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता व त्यापैकी तीन कारखाने बंद झाले आहेत. अहमदनगर विभागातील तीन व औरंगाबाद विभागातील ७ कारखान्यांनी उसाअभावी गाळप हंगाम आटोपला आहे.  म्हणजे गाळप हंगाम सुरू केलेल्या १४३ पैकी १३ कारखान्यांचा पट्टा पडला आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या अखेरला सुरू झालेले कारखाने फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बंद होण्यास सुरुवात झाली असून मार्चच्या पहिल्या आठवड्यात बºयापैकी हंगाम आटोपला जाईल असे सांगण्यात आले. आतापर्यंत राज्यातील साखर कारखान्यांनी ४१८ लाख मे. टन ऊस गाळप केला असून ४५६ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. एकट्या सोलापूर जिल्ह्यातच ५० लाखांपेक्षा अधिक गाळप कमी होणार आहे. 

राज्यातील साखर हंगामावर एक नजर

  • -   कोल्हापूर जिल्हा ९५ लाख ५७ हजार मे. टन गाळप करुन प्रथम क्रमांकावर असून, पुणे जिल्हा ५८.८८ लाख मे.टन गाळप करुन दुसºया क्रमांकावर आहे.
  • -   दरवर्षी राज्यात प्रथम क्रमांकावर असलेला सोलापूर जिल्हा ५२ लाख गाळप करुन तिसºया क्रमांकावर आहे. ऊस क्षेत्राची स्थिती पाहता सोलापूर जिल्हा गाळपात आणखीन मागे येईल असे सांगण्यात आले.
  • -  सातारा जिल्हा ४८ लाख ८१ हजार मे.टन, सांगली जिल्हा ४६.७१ लाख व अहमदनगर जिल्हा ४४.१५ लाख मे.टन  गाळप झाले आहे.
  • -   मराठवाड्यातील केवळ जालना व बीड या दोन जिल्ह्यातील गाळप ८ लाखांपेक्षा अधिक झाले असून अन्य जिल्ह्याचे गाळप फारच कमी आहे. 

राज्यात सर्वाधिक साखर कारखाने व गाळप होणारा सोलापूर जिल्ह्यातील एक साखर कारखाना बंद झाला आहे. ऊस तोडणी यंत्रणा अपुरी असल्याने कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. यामुळेच ऊस कमी असला तरी कारखाने सुरू आहेत. जवळपास सर्वच कारखाने १० मार्चपर्यंत बंद होतील.  - रविकांत पाटील

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूरahmadpur-acअहमदपूरPuneपुणे