शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 08:57 IST

शेतकऱ्यांचे तीन लाखांपर्यंतचे कर्ज माफ, जातीय जनगणना, आरोग्य विमा अशा विविध योजना राबविल्या जातील, असे आश्वासनही खरगे यांनी वसईतील जनतेला दिले. 

वसई : विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सर्वप्रथम २ लाख ८० हजार जणांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला जाईल. सरकार स्थापन झाल्यानंतर लगेच डिसेंबरपासूनच त्याची भरती प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे आश्वासन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी वसईतील सभेत सोमवारी दिले.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यास राज्यातील महिला, शेतकऱ्यांसाठीही विशेष योजना राबवण्यात येणार आहेत. यामध्ये महिलांना महालक्ष्मी योजनेतून प्रतिमहिना तीन हजार रुपये, महिलांसाठी मोफत बस प्रवास, ५०० रुपयांत एक याप्रमाणे सहा गॅस सिलिंडर, १०० युनिट वीज मोफत, शेतकऱ्यांचे तीन लाखांपर्यंतचे कर्ज माफ, जातीय जनगणना, आरोग्य विमा अशा विविध योजना राबविल्या जातील, असे आश्वासनही खरगे यांनी वसईतील जनतेला दिले. 

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी विजय पाटील आणि संदीप पांडे यांच्या प्रचारार्थ माणिकपूर येथील मैदानात स्वाभिमान सभा घेण्यात आली. या सभेला महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांतील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४thane kokan regionThane Kokan Assembly Election 2024vasai-acवसईMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे