शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांसाठी १,७४७ घरे

By admin | Updated: December 2, 2014 04:32 IST

राज्यातील पोलीस वसाहतींच्या दुर्दशेबाबत सर्वत्र टीकेची झोड उठविली जात आहे

नारायण जाधव, ठाणेराज्यातील पोलीस वसाहतींच्या दुर्दशेबाबत सर्वत्र टीकेची झोड उठविली जात आहे. गृह खात्याविषयी पोलीस कर्मचाऱ्यांत संताप आहे़ त्यामुळे आपल्याच कर्मचाऱ्यांची ही नाराजी दूर करण्यासाठी आता राज्यात नव्याने १ हजार ७४७ नवीन घरे बांधण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला आहे़ यानुसार, अर्थसंकल्पात पोलिसांच्या घरांसाठी ७०़२३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात गृह खात्याने ४२ कोटी १३ लाख ८० हजार रुपयांचा निधी पोलीस गृहनिर्माण महामंडळास वितरित केला आहे़ राज्यातील अनेक पोलीस वसाहतींना देखभाली अभावी घरघर लागली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासह इतर विभागांनी, निधीचे कारण पुढे करून त्याकडे दुर्लक्ष केले आहे़ यामुळे या वसाहतींच्या डागडुजीसाठीही निधी देण्याची मागणी होत आहे़या निधीतून औरंगाबाद येथील राज्य राखीव दलाच्या पोलिसांसाठी तेथील सातारा भागात ३०८ निवासस्थानांसाठी अडीच कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत़ औरंगाबाद पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ५६ निवासस्थाने बांधण्यासाठी १ कोटी १८ लाख ६ हजार रुपये दिले आहेत़ तुळजापूरच्या नवरात्रौत्सवात लागणारा वाढीव बंदोबस्त लक्षात घेता, त्यासाठी बाहेरगावांहून येणाऱ्या पोलिसांची गैरसोय दूर व्हावी, म्हणून तब्बल ४०० निवासस्थाने बांधण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला आहे. यावर ३ कोटी ४८ लाख ८७ हजार रुपये खर्च पहिल्या टप्प्यास मंजूर केला आहे़याशिवाय, रायगड जिल्ह्यात अलिबाग येथे ३६ घरांसाठी ४० लाख १० हजार, सोलापूर येथील सोरेगाव येथे राखीव दलाच्या पोलिसांच्या १९७ घरांसाठी ४ कोटी ३५ लाख ८ हजार, विटा-सांगली येथे ५१ घरांसाठी ३ कोटी २ लाख १८ हजार, आटपाडी येथे ४७ घरांसाठी ८४ लाख ७५ हजार, नंदुरबार येथे १६८ घरांसाठी १ कोटी ७६ लाख २४ हजार आणि यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील ५२ घरांसाठी ५ कोटी ६६ लाख ८५ हजार असे एकूण ४२ कोटी १३ लाख ८० हजार रुपये गृह खात्याने नोव्हेंबरअखेरीस मंजूर केले आहेत़