शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
6
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
7
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
8
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
9
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
10
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
11
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
12
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
13
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
14
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
15
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
16
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
17
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
18
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
19
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
20
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट

कृषी पंपांचे १५ हजार कोटींचे वीजबिल माफ 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2020 6:54 AM

ऊर्जा विभागाने केंद्र सरकारकडे १० हजार कोटींच्या अनुदानाची सातत्याने मागणी केली, पण दाद मिळाली नाही. राज्याला केंद्राकडून जीएसटीचे २८ हजार कोटी रुपये यायचे आहेत.

 लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कृषी पंपधारक शेतकऱ्यांना वीज बिलात माफी व सवलती देण्याचा जो निर्णय राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना १५ हजार कोटी रुपयांची एकूण माफी मिळणार असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शुक्रवारी सांगितले. 

पत्रपरिषदेत बोलताना ते म्हणाले की, राज्यात ४२ लाख कृषी पंपधारकांची ४२ हजार १६० कोटी रुपये थकबाकी आहे. त्यापैकी १५ हजार कोटी रुपयांचे वीजबिल माफ करणार आहोत. कृषी पंपधारकांकडून जी थकबाकी वसूल केली जाईल, त्यातील ६६ टक्के निधी गाव आणि सर्कलच्या पायाभूत सुविधांसाठी वापरण्यात येणार आहे. हा निधी वाटप करण्याचा अधिकार संबंधित पालकमंत्र्यांना असेल. ग्रामपंचायतीशी सांगड घालूनच हा पायाभूत विकास करण्यात येणार आहे.

ऊर्जा विभागाने केंद्र सरकारकडे १० हजार कोटींच्या अनुदानाची सातत्याने मागणी केली, पण दाद मिळाली नाही. राज्याला केंद्राकडून जीएसटीचे २८ हजार कोटी रुपये यायचे आहेत. राज्यातील भाजपवाल्यांना आंदोलन करायचेच असेल तर त्यांनी केंद्राविरुद्ध करावे,  असे आवाहनही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले.

मुंबई वीजखंडितचा अहवाल कॅबिनेटमध्येमुंबईत वीजपुरवठा खंडितप्रकरणी राज्य समितीचा चौकशी अहवाल आपल्याकडे आला आहे. मात्र, तो आधी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल. केंद्रीय समितीचा अहवाल अद्याप यावयाचा आहे. तो आल्यानंतरच आपण अहवालातील निष्कर्ष उघड करू. असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून जगातील नामवंत शहरांमध्ये कोणती यंत्रणा वापरली जाते याचा अभ्यासही सुरू असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतFarmerशेतकरी