शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

धुलिवंदनाला कसले रंग खेळता रे?...रंगपंचमी विसरलात का? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 15:57 IST

मुंबई , पुणे आदी शहरांत बिहार, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आदी ठिकाणांहून नोकरी, शिक्षणासाठी मुले येऊ लागली आणि सुरू झाली सण , उत्सव, परंपरा यांची सरमिसळ.

आठवतंय.... माझ्या लहानपणीरंगपंचमीलाच मोठ्या धुमधडाक्यात रंगपंचमी साजरी केली जाते असे. चुकूनही धुलिवंदनला रंग खेळणारे कुणी दिसत नसत.  समजा कुणी दिसलेच तर घरातली, आजूबाजूची वडीलधारी माणसे त्यांचे चांगलेच कान उपटत. रंगपंचमी अजून लांब आहे, तेव्हा खेळ रंग असे सांगत. पण गेल्या काही वर्षात हा ट्रेंड बदलतोय. हळूहळू रंगपंचमी ऐवजी धूलिवंदन साजरे करण्याकडे तरुणाईचा कल वाढत आहे. त्याचे एक प्रमुख कारण म्हणजे मुंबई , पुणे आदी शहरांत बिहार, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आदी ठिकाणांहून नोकरी, शिक्षणासाठी मुले येऊ लागली आणि सुरू झाली सण , उत्सव, परंपरा यांची सरमिसळ.

त्यांचे सण- उत्सव साजरे करण्यात गैर काहीच नाही. पण त्यात आपल्या मूळ सणांची गळचेपी किंवा त्यांना दुय्यम स्थान का?, असा प्रश्न उभा राहतो. ते लोक कधीच रंगपंचमीला आपण रंग खेळू, असे म्हणताना आढळून येत नाहीत. खरे तर पुन्हा आपण सर्व भारतीय आहोत, प्रादेशिक , परप्रांतीय वादांना खतपाणी किंवा मनसेच्या ओंजळीने पाणी पिणारे अशाही काही प्रतिक्रिया, भावना अनेकांच्या मनात येऊ शकतात. पण मित्रांनो, मुळात आधीच आपल्या प्रत्येक सणांचे सध्या इव्हेंट होत आहे. त्यातील मतितार्थाशी कुणाला काही एक देणे घेणे नाही. त्यात परत असे आपल्या सणांवर होणारे एक एक अतिक्रमण.

शाळा , कॉलेज, सरकारी कार्यालये आदी ठिकाणी धुलिवंदनलाच सुट्टी असते. त्यामुळे त्याच दिवशी रंग खेळण्याचा आनंद लुटण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतात. आपल्या मुलांना सुद्धा रंगपंचमी आणि धूलिवंदन यातले धूलिवंदनच जवळ वाटते. रंगपंचमी कधी येते आणि कधी जाते याची त्यांना कल्पना देखील नसते. धुळवड वेगळी आणि रंगपंचमी वेगळी, हा फरकही अनेकांना माहीत नसेल. या सर्व बदललेल्या परिस्थितीत आपण तरी निदान आपल्या सणांची प्रतिष्ठा जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायला हवा. प्रांताप्रांतात भेदाभेद करणे हा मुद्दाच इथे नाहीये. पण कुठे तरी आपल्या सणांवर गदा येत आहे याचे शल्य मनात घर करून आहे. 

पुणे - मुंबई सारखी शहरे सोडा आता तर खेडेगावांकडे सुद्धा धुलिवंदनलाच रंग खेळले जातात. असेच वातावरण कायम राहिले तर महाराष्ट्रीय सण काळाच्या पडद्याआड जायला वेळ लागणार नाही. पण या सणांकडे लक्ष द्यायला वेळ कुणाकडे आहे म्हणा. सर्व जण आपापल्या पोटापाण्याच्या धावपळीत व्यग्र आहेत. सण , उत्सवांचे महत्त्व फक्त सुट्टीचा आनंद आणि गोड- धोड खाण्यापुरतेच मर्यादित उरलेय का, असेही काही वेळा मनात येऊन जाते.

टॅग्स :Puneपुणेcolourरंग