शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
2
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
3
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
4
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
5
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
6
'चंदू चॅम्पियन'मध्ये पोलिस इन्स्पेक्टरच्या भुमिकेत श्रेयस तळपदे, कार्तिक आर्यनचं कौतुक करत म्हणाला...
7
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
8
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
9
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
10
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
11
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
12
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
13
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
14
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
15
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
16
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
17
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
18
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
19
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
20
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!

बहिणीला म्हणाला, मेडिकलमध्ये जाऊन येतो अन्...; लातुरात रेल्वे उड्डाण पुलावरुन उडी मारुन तरुणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 5:50 PM

बहिणीकडून चहा घेऊन घराबाहेर पडला तो परतलाच नाही...

लातूर: बहिणीकडून चहा घेऊन घराबाहेर पडलेल्या एका तरुणाने लातूरमधील बार्शी रोड रेल्वे उड्डाण पुलावरुन उडी मारुन आयुष्य संपविल्याची घटना मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. आनंद शिवाजीराव क्षीरसागर (वय 27,रा. चिखली ता. अहमदपूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत दुपारी  एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, आहमदपूर तालुक्यातील चिखलीचा रहिवासी असलेला आनंद क्षीरसागर याच्या दोन्ही बहिणी लातूरतील श्रीनगर भागात वास्तव्याला आहेत. आनंद क्षीरसागर त्याच्या बहिणीकडे आला होता. मंगळवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास मेडिकलवरून गोळी आणतो म्हणून घराबाहेर पडला. त्यांनतर बार्शी रोडवर असलेल्या रेल्वे उड्डाण पुलावरून उडी मारुन आत्महत्या केली. तर इकडे जवळपास तास-दीड तास झाले भाऊ असला नाही म्हणून बहिणीने भावाच्या मोबाइलवर फोन केला. घटनास्थळी असलेल्या एका व्यक्तीने मोबाइल उचलून घटनेची माहिती दिली.

बहिण म्हणते, माझा भाऊ शांत...

ही घटना ऐकून बहिणीच्या पायाखालची जमीनच सरकली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यालाही टोल फ्री क्रमांकावरून घटनेची माहिती मिळाली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, सहायक पोलीस निरीक्षक सर्जेराव जगताप, पोलीस नाईक मन्मथ धुमाळ यांच्या पथकाने भेट देऊन पंचनामा केला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मयत आनंदची बहिण म्हणते माझा भाऊ निर्व्यसनी आणि शांत स्वभावाचा होता. त्याचे अद्याप लग्नही झाले नव्हते. त्याला काही ताणतणावही नव्हता. मात्र, त्याने आत्महत्या का केली? हेच समजत नाही. या घटनेने कुटूंबीयांना धक्का बसला आहे. 

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस