शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

दोन एकरात ४४ क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:17 IST

शेतीत योग्य मशागत, बियाणांची निवड, वेळोवेळी खत व फवारणी केली की उत्पादन हमखास निघतेच. त्याला निसर्गाची योग्य साथ मिळाली ...

शेतीत योग्य मशागत, बियाणांची निवड, वेळोवेळी खत व फवारणी केली की उत्पादन हमखास निघतेच. त्याला निसर्गाची योग्य साथ मिळाली की, मग तर सोने पे सुहागा. असेच काही घडले तिवटघाळचे शेतकरी शिवाजीराव पाटील यांच्या बाबतीत. रबी हंगामात त्यांनी तब्बल १८ एकर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी केली. यासाठी त्यांनी राहुरी विद्यापीठाचे फुले विक्रम हे बियाणे वापरले. क्षेत्र वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने सर्वत्र समान मेहनत करणे शक्य झाले नाही. ९ एकरात पाणी कमी पडल्याने त्या क्षेत्रावर ५५ क्विंटल उत्पादन निघाले. दुसरीकडे असलेल्या ७ एकरात ७५ क्विंटल हरभरा निघाला आहे. दोन एकरात आंब्याची झाडे लावण्यात आली आहेत. त्यात आंतरपीक म्हणून हरभरा पेरण्यात आला. याच दोन एकर क्षेत्रावर तब्बल ४४ क्विंटल हरभरा निघाल्याचे शेतकरी शिवाजीराव पाटील यांनी सांगितले.

तीन ते चार फुट काळी जमीन...

तिवघाळ शिवारात दोन ते चार फुट जमीन काळी आहे. दोन एकरात आंब्याची झाडे असल्याने स्प्रिंकलरने एकदा पाणी देता आले नाही. त्यामुळे भुईपाटाने दोनवेळा पाणी दिले. पेरणीनंतर ४५ दिवसांनी पहिले पाणी दिले अन् दुसरे पाणी ७२ दिवसांनी दिले. जवळपास अडीच ते तीन फुट उंचीची झाडे होती. रास केल्यावर दोन एकरात ६४ कट्टे हरभरा निघाला. त्याचे वजन घेतले असता तब्बल ४४ क्विंटल उत्पादन झाल्याचे शेतकरी शिवाजीराव पाटील यांनी सांगितले.

मशागतीचे नियोजन महत्वाचे- डॉ.नंदकुमार कुटे

राहुरी विद्यापीठाने २०१७ मध्ये हे फुले विक्रम हे बियाणे विकसित केले. हवामानातील बदल, कमी अधिक पाण्याला हे वाण अतिशय चांगले आहे. तिवटघाळचे शेतकरी शिवाजी पाटील यांनी दोन एकरात घेतलेले उत्पादन उच्चांकी आहे. त्यासाठी त्यांची मेहनत, मशागत महत्वाची ठरली. त्यांना ४४ क्विंटल उत्पादन निघाले. या वाणाचे हेक्टरी ६० क्विंटलपर्यंत उत्पादन निघू शकते, असा दावा राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुंटे यांनी सांगितले.