शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शेतीत काम करणाऱ्या महिला करिअर वुमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:22 IST

जलजीवन मिशनबाबत जनजागृती व उमेद अभियानाअंतर्गत आर्थिक साक्षरता, बँक कर्ज वितरणासाठी येथील कृष्णाई मंगल कार्यालयात मंगळवारी आयोजित महिला मेळाव्यात ...

जलजीवन मिशनबाबत जनजागृती व उमेद अभियानाअंतर्गत आर्थिक साक्षरता, बँक कर्ज वितरणासाठी येथील कृष्णाई मंगल कार्यालयात मंगळवारी आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जलजीवन मिशन अभियानच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, पंचायत समिती सभापती प्रा. शिवाजीराव मुळे, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, पंचायत समिती उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, बसवराज पाटील नागराळकर, कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे, गटविकास अधिकारी महेश सुळे आदी उपस्थित हाेते.

राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या समान भागीदारीतून राज्यात जलजीवन मिशन राबविले जात आहे. या मिशनअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला २०२४ पर्यंत नळजोडणी दिली जाणार असून, यातून प्रत्येक व्यक्तिला प्रतिदिन ५५ लीटर पाणी पुरवठा केला जाणार आहे.

शुध्द पाणी, स्वच्छता महत्त्वाची...

राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या आवश्यक गरजा म्हणून गणल्या जातात. पण यापुढे शुध्द पाणी आणि स्वच्छता या दोन घटकांची जोड देणे आवश्यक आहे. या मिशनअंतर्गत ते ग्रामीण भागात पाणी उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध आहेत. बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सामाजिकरण होत असून, शासनामार्फत बचत गट चळवळीस गती दिली जाईल.