शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

कुठे कुठे शोधू रोजगार मी; दुष्काळाची दाहकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 23:35 IST

प्रत्येक मजुराच्या हाताला काम मिळावे म्हणून गेल्या काही वर्षांपासून शासनाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यात येते.

वर्ष- दोन वर्ष उलटली की, मराठवाड्यात दुष्काळ हे समिकरणच झाले आहे. लातूर जिल्ह्यात यंदाही अत्यल्प पर्जन्यमानामुळे दुष्काळाचे चटके हिवाळ्यातच बसू लागले आहेत. प्रशासनाकडून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अपेक्षित प्रमाणात कामे सुरु करण्यात आली नसल्याने मजुरांपुढे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्यातूनच खेड्यातील काही नागरिक पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर करीत आहेत.

प्रत्येक मजुराच्या हाताला काम मिळावे म्हणून गेल्या काही वर्षांपासून शासनाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यात येते. विशेषत: दुष्काळी परिस्थितीत या योजनेचा सर्वाधिक लाभ होतो. दुष्काळात शेतमजूर, मजुरांच्या हाताला काम मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची उपासमार होते.ही समस्या सुटावी म्हणून दुष्काळात प्राधान्याने ही योजना राबविण्यावर सर्वाधिक भर असतो. लातूर जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत ६४ टक्के पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती आहे़ शेतीतून अल्प प्रमाणात उत्पादन निघाल्याने शेतकरी संकटात आहेत. मजुरांची तर घालमेलच होत आहे़ जिल्ह्यातील २ लाख २८ हजार ९९८ कुटुंबांत ५ लाख ८१ हजार ४०४ मजूर नोंदणीकृत आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेमार्फत सध्या सिंचन विहिरीच्या दोन कामांवर १८० मजूर आहेत. घरकुलांच्या ३२ कामांवर ७६८, शोषखड्ड्यांच्या १७० कामांवर १९४० तर शौचालयाच्या ११ कामांवर २६४ मजूर कार्यरत आहेत. वास्तविक पहाता ५ लाख ८१ हजार ४०४ मजूरांच्या तुलनेत ३ हजार १५२ मजूरांच्या हाताला काम आहे. उर्वरित मजुरांना कामच मिळत नसल्याने हे मजूर हतबल झाले आहेत. त्यातून खेड्यातील मजुरांचे रोजगारासाठी स्थलांतर होऊ लागले आहे़ गत आठवड्यात जळकोट तालुक्यातील दोन हजार कुटुंबांनी रोजगारासाठी अन्यत्र स्थलांतर केले आहे.

दुष्काळामुळे मजूर संकटात असताना मजुरांकडून कामाची मागणी होत नसल्याचा दावा प्रशासन करीत आहे. एकीकडे मजुरांचे स्थलांतर सुरु आहे. त्यामुळे वाडी- तांड्यावर सन्नाटा दिसत आहे़ तर दुसरीकडे प्रशासन पोकळ दावे ठोकत आहे़ वास्तवात अधिकारी मजुरांच्या मागणीला दादच देत नाहीत. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न सुटणार कसा? हा प्रश्न अनुत्तरीय आहे.अनेक ठिकाणी यंत्राच्या साह्याने कामे करून मजूर दाखविली जातात. शासनाचा निधी तात्काळ पदरी पाडून घेण्यासाठी गावातीलच कंत्राटदार अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा खेळ करतात. यात खरा मजूर मात्र भरडत आहे. हाताला कामे नसल्याने मजुरांची भटकंती वाढत चालली आहे.

टॅग्स :droughtदुष्काळ