शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वीकेंड लॉकडाऊनमुळे व्यापारी नाराज, प्रशासन हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदपूर : दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या वीकेंड लॉकडाऊनला व्यापारी, नागरिकांनी अत्यल्प प्रतिसाद दिला आहे. बाजारपेठ बंद-चालूमुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदपूर : दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या वीकेंड लॉकडाऊनला व्यापारी, नागरिकांनी अत्यल्प प्रतिसाद दिला आहे. बाजारपेठ बंद-चालूमुळे व्यापारी नाराज तर प्रशासन हतबल असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकही संभ्रमावस्थेत आहेत. शनिवार आणि रविवार आल्यानंतर लॉकडाऊन आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.

अहमदपूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून, सध्या संपूर्ण तालुक्यात ६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे कोविड केअर सेंटर व सर्व कोविड रुग्णालये बंद झाली आहेत. कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर नागरिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाच्या नियमानुसार दररोज सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत आस्थापना सुरु ठेवण्याची वेळ असतानाही प्रशासनाचेही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे काही दुकाने संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरु असल्याचे पाहायला मिळते.

वीकेंड लॉकडाऊनमध्येही शिथिलता आल्याचे दिसून येत आहे. व्यापारी शनिवार व रविवार येताच पोलीस अथवा महसूलचे वाहन केव्हा येते, त्याची प्रतीक्षा करत असतात. पोलिसांचे वाहन आल्यानंतर शटर बंद केले जाते. वाहन गेल्यानंतर पुन्हा दुकाने उघडली जातात. त्यामुळे प्रशासन हतबल तर व्यापाऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. दुकानातील कामगारांना बोलवावे की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे पूर्णवेळ लॉकडाऊन करा आणि त्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे अन्यथा वीकेंड लॉकडाऊन रद्द करा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. नागरिकही दर आठवड्यात संभ्रमावस्थेत असतात. शनिवार आल्यानंतर दुकाने उघडणार का नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.

नागरिकांनी स्वत: नियम पाळावेत...

शहर व तालुक्यातील रुग्णसंख्या कमी झाली असली तरी त्याचे कारण लॉकडाऊन आहे. रहदारीवर नियंत्रण असते. नागरिकांनी स्वतः नियम पाळले पाहिजेत, असे उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लांजिले यांनी सांगितले.

व्यापाऱ्यांत साशंकता...

दर शनिवारी व रविवारी अनेक व्यापारी आस्थापना उघडतात. पोलीस, महसूल प्रशासनाची फेरी आल्यानंतर ते बंद करतात. त्यानंतर सुरु करतात. त्यामुळे प्रशासन हतबल आहे. व्यापारी बंद-चालूमुळे नाराज आहेत. कुठलाही एक निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी अन्यथा लॉकडाऊनमध्ये सूट द्यावी, असे किराणा असोसिएशनचे अध्यक्ष मन्मथ प्रयाग म्हणाले.

कामगारांची अडचण...

शनिवारी व रविवारी ग्राहक मोठ्या प्रमाणात येतात. सध्या आषाढात विवाह असल्यामुळे नागरिकांनाही अडचणीचे होत आहे. वीकेंड लॉकडाऊनमुळे कामगाराला कामावर बोलवावे का नाही, असा प्रश्न पडत आहे. त्यामुळे संभ्रमावस्था होत असल्याचे शिवाजी सूर्यवंशी यांनी सांगितले.

लॉकडाऊनचे नियम पाळा...

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शनिवारी व रविवारी वीकेंड लॉकडाऊन असून, याबाबत पोलिसांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे यात कुठलीही सूट देण्यात आलेली नाही, असे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.