शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ४१ गावांना अधिग्रहणांद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:15 IST

लातूर : जून महिना संपत आला असला तरी समाधानकारक पावसाने अद्यापही हजेरी लावली नाही. त्यामुळे टंचाईची दाहकता कायम असून, ...

लातूर : जून महिना संपत आला असला तरी समाधानकारक पावसाने अद्यापही हजेरी लावली नाही. त्यामुळे टंचाईची दाहकता कायम असून, ११६ गाव-वाड्यांनी १३९ अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समितीस्तरावर सादर केले आहेत. यापैकी ४१ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून, सद्य:स्थितीत ४६ अधिग्रहणाद्वारे ४१ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.

लातूर तालुक्यातील १२, औसा ६, निलंगा ७, रेणापूर २४, अहमदपूर ४२, चाकूर ११, शिरूर अनंतपाळ १, उदगीर ४, तर जळकोट तालुक्यातील ९, अशा एकूण ९८ गावे, तर १८ वाड्यांचे अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समितीस्तरावर दाखल आहेत. यापैकी स्थळ पाहणीअंती दोन प्रस्ताव वगळण्यात आले आहेत. तहसीलस्तरावर १०६ गावांचे १२४ प्रस्ताव प्रलंबित आहेत, तर पंचायत समितीस्तरावर ९ गावांचे १२ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, उपविभागीय अधिकारी कार्यालयाने ३२ गावे आणि ९ वाड्या, असे एकूण ४१ गावांचे प्रस्ताव मंजूर केले असून, ४६ अधिग्रहणाद्वारे या गावांची तहान भागविली जात आहे. जिल्ह्यात मागील वर्षी परतीच्या पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे पाणीपातळीत काही प्रमाणात वाढ झाली होती. परिणामी, यावर्षी टंचाईच्या झळा जास्त जाणवल्या नाहीत. टंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ११ कोटी रुपयांचा कृती आराखडाही तयार करण्यात आला होता. त्याअनुषंगाने उपाययोजनाही राबविल्या जात आहेत. दरम्यान, टँकरसाठी दोन ते तीन प्रस्ताव दाखल झाले होते. मात्र, पडताळणीनंतर टँकरची गरज नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यात एकही टँकर सुरू झाले नसल्याचे समाधानकारक चित्र आहे.

अहमदपूर तालुक्यात १७ अधिग्रहणे

लातूर तालुक्यात ८, औसा २, निलंगा ६, अहमदपूर १७, उदगीर ५, तर जळकोट तालुक्यात ८ अधिग्रहणे मंजूर आहेत. त्याद्वारे संबंधित गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. जून महिना संपत आला असला तरी अद्याप पाऊस झाला नसल्याने टंचाई निवारण कक्षाच्या वतीने अधिग्रहणे सुरू ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, ती कधीपर्यंत सुरू ठेवायची, याबाबत निर्णय झाला नसल्याचे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.