शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

लातुरात पुन्हा पाणी टंचाई, किल्लारीत २ महिन्यांपासून निर्जळी; पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती

By संदीप शिंदे | Updated: June 19, 2023 16:03 IST

थकबाकीमुळे माकणीचा पुरवठा बंद : चिंचोली तलावातील पाणीसाठ संपला

किल्लारी : औसा तालुक्यातील किल्लारी येथे मागील दोन महिन्यांपासून निर्जळी असून, पाण्यासाठी ग्रामस्थांना भर उन्हात भटकंती करावी लागत आहे. याकडे ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

किल्लारी गावाला माकणी येथील धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत हाेता. मात्र, थकबाकीमुळे हा पुरवठा बंद करण्यात आला. पर्यायी व्यवस्था म्हणून चिंचोली येथील तळे व जुन्या गावातील विहीरीतून पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, चिंचोली तळ्यातील पाणीसाठा संपला असून, जुन्या गावातील विहीरीचे पाणीही आटले आहे. परिणामी, ग्रामस्थांना पाणीपुरवठा कसा करावा, यासाठी सरपंच युवराज गायकवाड व सदस्यांच्या बैठकावर बैठका सुरु आहेत. मात्र, त्यावर कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. सध्या उन्हाची तीव्रता वाढलेली असल्याने जलस्त्राेतांची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे गावातील तुरळक बोअरवेल सुरु असून, त्यावरुन पाणी आणण्यासाठी भरउन्हात ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. विशेष म्हणजे पाणीटंचाईमुळे ६०० रुपये देऊन विकतचे पाणी टँकर घ्यावे लागत असून, सर्वसामान्य नागरिकांना पैसे देऊन टँकर घेणे परवडणारे नसल्याने पाण्याच्या शोधात उन्हात फिरावे लागत आहे. बोअरच्या हौदावर तासनतास पाणी कधी येल याची प्रतीक्षा करावी लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधींनी तातडीने पाणी समस्येवर तोडगा काढून नागरिकांची गैरसोय दुर करावी अशी मागणी होत आहे.

पाण्याचे नियोजन सुरु...माकणी धरणाचे पाणी थकबाकीमुळे बंद आहे. तर चिंचोली तळ्यातील पाणीसाठा संपला असून, जुन्या गावातील विहीरीचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे पाणी कसे उपलब्ध होईल, यावर ग्रामपंचायकडून नियोजन करण्यात येत असल्याचे सरपंच युवराज गायकवाड यांनी सांगितले....

टॅग्स :laturलातूरwater scarcityपाणी टंचाईWaterपाणीagitationआंदोलन