शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

लातुरात पुन्हा पाणी टंचाई, किल्लारीत २ महिन्यांपासून निर्जळी; पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती

By संदीप शिंदे | Updated: June 19, 2023 16:03 IST

थकबाकीमुळे माकणीचा पुरवठा बंद : चिंचोली तलावातील पाणीसाठ संपला

किल्लारी : औसा तालुक्यातील किल्लारी येथे मागील दोन महिन्यांपासून निर्जळी असून, पाण्यासाठी ग्रामस्थांना भर उन्हात भटकंती करावी लागत आहे. याकडे ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

किल्लारी गावाला माकणी येथील धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत हाेता. मात्र, थकबाकीमुळे हा पुरवठा बंद करण्यात आला. पर्यायी व्यवस्था म्हणून चिंचोली येथील तळे व जुन्या गावातील विहीरीतून पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, चिंचोली तळ्यातील पाणीसाठा संपला असून, जुन्या गावातील विहीरीचे पाणीही आटले आहे. परिणामी, ग्रामस्थांना पाणीपुरवठा कसा करावा, यासाठी सरपंच युवराज गायकवाड व सदस्यांच्या बैठकावर बैठका सुरु आहेत. मात्र, त्यावर कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. सध्या उन्हाची तीव्रता वाढलेली असल्याने जलस्त्राेतांची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे गावातील तुरळक बोअरवेल सुरु असून, त्यावरुन पाणी आणण्यासाठी भरउन्हात ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. विशेष म्हणजे पाणीटंचाईमुळे ६०० रुपये देऊन विकतचे पाणी टँकर घ्यावे लागत असून, सर्वसामान्य नागरिकांना पैसे देऊन टँकर घेणे परवडणारे नसल्याने पाण्याच्या शोधात उन्हात फिरावे लागत आहे. बोअरच्या हौदावर तासनतास पाणी कधी येल याची प्रतीक्षा करावी लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधींनी तातडीने पाणी समस्येवर तोडगा काढून नागरिकांची गैरसोय दुर करावी अशी मागणी होत आहे.

पाण्याचे नियोजन सुरु...माकणी धरणाचे पाणी थकबाकीमुळे बंद आहे. तर चिंचोली तळ्यातील पाणीसाठा संपला असून, जुन्या गावातील विहीरीचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे पाणी कसे उपलब्ध होईल, यावर ग्रामपंचायकडून नियोजन करण्यात येत असल्याचे सरपंच युवराज गायकवाड यांनी सांगितले....

टॅग्स :laturलातूरwater scarcityपाणी टंचाईWaterपाणीagitationआंदोलन