शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
3
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
4
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
5
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
6
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
7
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
8
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
9
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
10
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
11
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
12
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
13
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
14
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
15
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
16
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
17
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
18
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
19
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
20
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?

लातुरात पुन्हा पाणी टंचाई, किल्लारीत २ महिन्यांपासून निर्जळी; पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती

By संदीप शिंदे | Updated: June 19, 2023 16:03 IST

थकबाकीमुळे माकणीचा पुरवठा बंद : चिंचोली तलावातील पाणीसाठ संपला

किल्लारी : औसा तालुक्यातील किल्लारी येथे मागील दोन महिन्यांपासून निर्जळी असून, पाण्यासाठी ग्रामस्थांना भर उन्हात भटकंती करावी लागत आहे. याकडे ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

किल्लारी गावाला माकणी येथील धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत हाेता. मात्र, थकबाकीमुळे हा पुरवठा बंद करण्यात आला. पर्यायी व्यवस्था म्हणून चिंचोली येथील तळे व जुन्या गावातील विहीरीतून पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, चिंचोली तळ्यातील पाणीसाठा संपला असून, जुन्या गावातील विहीरीचे पाणीही आटले आहे. परिणामी, ग्रामस्थांना पाणीपुरवठा कसा करावा, यासाठी सरपंच युवराज गायकवाड व सदस्यांच्या बैठकावर बैठका सुरु आहेत. मात्र, त्यावर कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. सध्या उन्हाची तीव्रता वाढलेली असल्याने जलस्त्राेतांची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे गावातील तुरळक बोअरवेल सुरु असून, त्यावरुन पाणी आणण्यासाठी भरउन्हात ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. विशेष म्हणजे पाणीटंचाईमुळे ६०० रुपये देऊन विकतचे पाणी टँकर घ्यावे लागत असून, सर्वसामान्य नागरिकांना पैसे देऊन टँकर घेणे परवडणारे नसल्याने पाण्याच्या शोधात उन्हात फिरावे लागत आहे. बोअरच्या हौदावर तासनतास पाणी कधी येल याची प्रतीक्षा करावी लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधींनी तातडीने पाणी समस्येवर तोडगा काढून नागरिकांची गैरसोय दुर करावी अशी मागणी होत आहे.

पाण्याचे नियोजन सुरु...माकणी धरणाचे पाणी थकबाकीमुळे बंद आहे. तर चिंचोली तळ्यातील पाणीसाठा संपला असून, जुन्या गावातील विहीरीचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे पाणी कसे उपलब्ध होईल, यावर ग्रामपंचायकडून नियोजन करण्यात येत असल्याचे सरपंच युवराज गायकवाड यांनी सांगितले....

टॅग्स :laturलातूरwater scarcityपाणी टंचाईWaterपाणीagitationआंदोलन