शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

ढोरसांगवी साठवण तलावाची पाणी पातळी जोत्याखालीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:24 IST

जळकोट : तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या ढोरसांगवी जिरगा प्रकल्पातील पाणी पातळी अद्यापही जोत्याखालीच असून, केवळ २० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ...

जळकोट : तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या ढोरसांगवी जिरगा प्रकल्पातील पाणी पातळी अद्यापही जोत्याखालीच असून, केवळ २० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तालुक्यातील अन्य भागात पाऊस झाल्याने बहुतांश साठवण तलाव ८० टक्के भरले. मात्र, या भागामध्ये पाऊसच झाला नसल्याने पाणी साठ्यात वाढ झालेली नाही.

डोंगरकोनाळी येथील साठवण तलावात अद्याप पाणी पातळी वाढली नसल्याने रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. ढोरसांगवी जिरगा या साठवण तलावाच्या वरच्या भागात लहान पाझर तलाव आहेत. वरच्या भागातूनच पाण्याचा स्रोत येथे येतो. हे पाझर तलाव भरल्याशिवाय या मोठ्या प्रकल्पात पाणी येत नाही. त्यामुळे प्रसंगी प्रकल्पातील पाणीसाठा मृतसाठा असून, मोठा पाऊस न झाल्यामुळे हा तलाव कोरडाच राहतो की काय, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. या तालुक्यातील सर्वात जुना व सर्वात मोठा असा ढोरसांगवीचा प्रकल्प असून, त्यापाठोपाठ डोंगरकोनाळीचाही मोठा साठवण तलाव आहे. धामणगाव, जिरगा, ढोरसांगवी, येलदरा, सोनवळा, धनगरवाडी, एवरी कोळनूर, लाळी खुर्द, लाळी बुद्रुक, करंजी, जगळपूर, हावरगा या भागात अत्यंत कमी पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे साठवण तलावातील जलसाठा तर वाढलाच नाही मात्र गेल्या २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने या भागातील मूग, उडीद सोयाबीनचे पीक पूर्णत: धोक्यात आले आहे. त्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

पिकांचे नुकसान, मदतीची मागणी

प्रशासनाने तत्काळ सोयाबीन, मूग, उडीद व गेलेल्या पिकांचे पंचनामे करावे, शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत सानुग्रह अनुदान म्हणून द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, जिल्हा परिषदेचे गटनेते जिल्हा परिषद सदस्य संतोष तिडके, बाजार समितीचे माजी सभापती मन्मथअप्पा किडे, सभापती बालाजी दबडे, उपसभापती सुनंदा धर्माधिकारी, बालाजी आगलावे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष महेश धूळशेटे, शिवानंद देशमुख, खादर लाटवाले, धनंज ब्रह्मंना यांनी केली आहे.