शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
2
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
3
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
6
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
7
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
8
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
9
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
10
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
11
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
12
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
14
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
20
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम पावसासाठी प्रतीक्षा पोषक वातावरणाची 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 18:48 IST

योग्य वातावरण निर्मिती होत नसल्याने प्रतीक्षा

ठळक मुद्देऔरंगाबाद, सोलापूर, नागपूर या तिन्ही ठिकाणी रडार यंत्रणा तयारकृषिमंत्री अनिल बोंडे यांची पत्रकार परिषदेत माहिती

लातूर : कृत्रिम पावसासाठी औरंगाबाद, सोलापूर, नागपूर या तिन्ही ठिकाणी रडार यंत्रणा तयार आहे़ विमाने आली आहेत़ मात्र, योग्य वातावरण निर्मिती होत नसल्याने भारतीय हवामान विभागाने हिरवा कंदील दाखविलेला नाही़ त्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग अद्याप राबविण्यात आला नसल्याची माहिती कृषिमंत्री डॉ़ अनिल बोंडे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली़ 

लातूर जिल्ह्यातील पाऊस, पीक स्थितीची पाहणी करण्यासाठी कृषिमंत्री डॉ़ बोंडे दौऱ्यावर आहेत़ मंगळवारी त्यांनी जिल्ह्यातील नळेगाव, आष्टामोड, शिरूर ताजबंद या ठिकाणी शिवार पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला़ यानंतर  पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मराठवाडा, विदर्भ आणि सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे़ त्यामुळे या ठिकाणी कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी होत आहे़ त्या अनुषंगाने यंत्रणा तयार आहे़ मात्र, पोषक वातावरण नसल्याने हवामान विभागाकडून हिरवा कंदिल मिळत नाही़ शिवाय, गतवर्षी राज्यात ९१ लाख शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता़ त्या तुलनेत ४९ लाख शेतकऱ्यांना विमा मिळालेला आहे़ यावर्षीही १ कोटी ५ लाख शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतला आहे़ पत्रपरिषदेला पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आ. त्र्यंबक भिसे, आ़ सुधाकर भालेराव, जि़प़ अध्यक्ष मिलिंद लातुरे, जिल्हाधिकारी जी़ श्रीकांत, उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे आदी उपस्थित होते़ 

पीकविम्यासाठी तालुकास्तरावर समितीप्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत़ त्यामुळे तालुकास्तरावर दक्षता समिती नेमली आहे़ यात दोन शेतकरी, पीकविमा कंपनीचे प्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी यांचा समावेश असणार आहे़ या समितीमुळे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण होण्यामध्ये मदत होणार आहे़

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाAgriculture Sectorशेती क्षेत्र