शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्सचे चाक पुन्हा पंक्चर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:18 IST

लातूर : लॉकडाऊन उठल्यानंतर ट्रॅव्हल्सचा प्रवास जाेरात सुरू झाला होता; मात्र गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यासह राज्यात सगळीकडे कोरोना ...

लातूर : लॉकडाऊन उठल्यानंतर ट्रॅव्हल्सचा प्रवास जाेरात सुरू झाला होता; मात्र गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यासह राज्यात सगळीकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्सची संख्या पुन्हा घटली असून, मोजक्याच काही गाड्या पुणे, मुंबई, औरंगाबादला धावत आहेत. त्यातही प्रवाशांचा प्रतिसाद अल्प असल्याने बस पूर्णक्षमतेने धावत नसून, डिझेलचा खर्च निघणेही अवघड झाले आहे.

लातूर जिल्ह्यातून पुणे, मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, नाशिक, शिर्डी, अहमदाबाद, गोवा आदी शहरांसाठी ट्रॅव्हल्स धावतात. कोरोनाच्या आधी दररोज ३०० हून अधिक बस धावत होत्या; मात्र लॉकडाऊनमुळे ट्रॅव्हल्स व्यवसाय अडचणीत आला. दरम्यान, गत काही महिन्यांत कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने बस पुन्हा पूर्ववत झाल्या होत्या. त्यातही निर्बंध असल्याने दररोज ३०० हून अधिक धावणाऱ्या बसची संख्या ६० वर पोहोचली आहे. आर्थिक उत्पन्न घटल्याने बँकांच्या वतीने हप्त्यासाठी वसुलीचा तगादा लावला जात आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्स व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.

गाडी रुळावर होती; पण...

कोरोनापूर्वी ट्रॅव्हल्स व्यवसायाची परिस्थिती चांगली होती. लातूर जिल्हाभरातून दररोज ३०० हून अधिक बस धावत होत्या; मात्र कोरोना आला आणि त्यामुळे लॉकडाऊन लागला. परिणामी, ट्रॅव्हल्स व्यावसायिक, तिकीट बुक करणारे, चालक-वाहक या सर्वांवर आर्थिक संकट कोसळले. बँकांचे हप्ते थकल्याने अनेकांनी बस विकल्या आहेत, तर सध्या ज्या ट्रॅव्हल्स चालू आहेत त्यांनाही डिझेलचा खर्च निघणे अवघड झाले आहे. एकंदरीत कोरोनाने ट्रॅव्हल्स व्यावसायिकांचे मोठे नुकसान केले आहे.

कोरोनामुळे ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने दररोजचा खर्च मिळणेही अवघड झाले आहे. हप्त्यांसाठी बँकांचा तगादा सुरू असून, उत्पन्न घटल्याने हप्ते भरणेही जिकिरीचे झाले आहे.

- सोमनाथ मेडगे, ट्रॅव्हल्स व्यावसायिक

कोरोनापूर्वी औरंगाबाद, पुणे, नाशिक या शहरांसाठी बस धावत होत्या; मात्र लॉकडाऊनमुळे बस उभ्याच राहिल्याने आर्थिक उत्पन्न घटले आहे. जिल्ह्यातून आता केवळ ६० ते ७० बस दररोज धावत आहेत, त्यांनाही परवडेनासे झाले आहे.

- जगदीश स्वामी, ट्रॅव्हल्स व्यावसायिक

कोरोना आला आणि त्यामुळे लॉकडाऊन लागला. अनेकांना तर हप्ते भरणेही अवघड झाले. त्यातच बँकांचा तगादा चालूच आहे. काेरोनामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे हप्ता भरणेही अवघड झाले आहे. शासनाने ट्रॅव्हल्स व्यवसायासाठी साहाय्य करण्याची गरज आहे.

- एजाज मनियार, ट्रॅव्हल्स व्यावसायिक