शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
2
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
3
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
4
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
5
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
6
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
7
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
8
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
9
Shreyas Iyer Injury Update: अय्यरबाबत जोखीम नको! वनडे मालिकेपूर्वी तब्येतीसंदर्भात मोठा खुलासा
10
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
11
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
12
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
13
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
14
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
15
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
16
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
17
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
18
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
19
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
20
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?

ज्यांना खड्डे बुजविता आले नाहीत, ते आमचे राजकारण काय संपविणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 06:18 IST

‘लोकमत’शी बोलताना माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ज्यांना रस्त्यावरचे खड्डे बुजविता आले नाहीत, ते विधानसभेनंतर शरद पवारांचे राजकारण संपणार, असे भाकित करीत आहेत.

- धर्मराज हल्लाळेभोकर (जि. नांदेड) : राजकारणात विचारांची लढाई अपेक्षित आहे, परंतु केंद्रात मिळालेल्या बहुमताने भाजपा अहंकारात बुडाली आहे. विरोधकांना शत्रू समजून संपविण्याची भाषा करू लागली आहे. त्यांना सत्तेची आलेली ही धुंदी जनता विधानसभेत उतरविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मला राजकारण सोडून आराम करण्याचा सल्ला देतात. अनुभवी ज्येष्ठ नेते असलेल्या शरद पवार यांचे राजकारणच संपणार म्हणतात, इतकी उन्मत्तपणाची भाषा मतदार सहन करणार नाहीत, असे सांगत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास व्यक्त केला.

‘लोकमत’शी बोलताना माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ज्यांना रस्त्यावरचे खड्डे बुजविता आले नाहीत, ते विधानसभेनंतर शरद पवारांचे राजकारण संपणार, असे भाकित करीत आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वर्षभरापूर्वी घोषणा केली होती, डिसेंबरनंतर रस्त्यावर खड्डा दिसणार नाही. वस्तुस्थिती मात्र भयंकर आहे. राज्यातील सुमारे ९० हजार किलोमीटर राज्यमार्गांपैकी निम्म्याहून अधिक रस्ते उद्ध्वस्त आहेत. राष्ट्रीय महामार्गाचेच चित्र जनतेसमोर मांडतात. गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे काय? प्रत्येक मतदारसंघात तालुक्यांना, जिल्ह्यांना जोडणाºया रस्त्यांची प्रचंड दुरवस्था आहे.घोषणा करण्यात पटाईत असलेल्या सरकारने पाच वर्षे जनतेची फसवणूक केली. गेल्या ४५ वर्षांतील बेरोजगारीचा उच्चांक भाजपा सरकारने गाठला. उद्योगधंदे बंद पडू लागले. नवीन नोकºया निर्माण झाल्या नाहीत. ज्या आहेत त्याही गमवाव्या लागल्या. मराठवाड्यातील औद्योगिक वसाहती मोडकळीस आल्या आहेत, हे या सरकारचे अपयश असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली.

भाजपाने वॉटर ग्रीडसारखी महत्त्वाकांक्षी योजना आणली आहे, ज्यामुळे मराठवाड्यात कायमच्या दुष्काळमुक्तीचा दावा आहे, हे मोठे काम नाही का?निवडणुकीच्या तोंडावरची ही घोषणा आहे. कथनी-करणीत फरक आहे. ऊर्ध्व पैनगंगा सिंचन प्रकल्पाचे पाणी मराठवाड्याला, त्यात नांदेड जिल्ह्यात मिळते. ते पाणी इतरत्र वळविण्याचा घाट सरकारने घातला आहे. ज्यामुळे १५ हजार हेक्टरवरील सिंचन क्षेत्राचे वाळवंट होईल.

दिवंगत नेते शंकरराव चव्हाणयांनी जायकवाडीसारखा प्रकल्प मराठवाड्याला दिला. ऊर्ध्व पैनगंगा, विष्णुपुरी, मांजरा, तेरणा हे सर्व प्रकल्प काँग्रेस नेत्यांच्या दूरदृष्टीने द्योतक आहे. काय काम उभे राहिले, हे जनतेसमोर आहे. फडणवीस सरकारच्या निव्वळ घोषणा आहेत. कोटींची उड्डाणे आहेत. एक कालवा जरी केला असेल तर त्यांनी सांगावे, असा प्रतिसवाल अशोक चव्हाण यांनी केला.

शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत मिळत आहे अन् तुम्ही म्हणता वाºयावर सोडले?कर्जमाफी जाहीर केली. सर्वांपर्यंत लाभ पोहोचले का? काही जणांना लाभ मिळाले की त्याचीच जाहिरातबाजी करायची. तुटपुंज्या मदतीचे काय बोलतात? शेतमालाच्या हमीभावाचे काय झाले, दुप्पट उत्पन्न करण्याचे काय झाले? फडणवीसांनी केलेली ही फसवणूक आहे. तूर, हरभरा, मूग खरेदी केंद्रांवरील रांगा आणि शेतकºयांचे हाल सर्वांसमोर आहेत. अनुदानासाठी जाचक अटी टाकल्या. ज्यामुळे लाखो शेतकºयांना अनुदानच मिळाले नाही.

झाकली मूठ सव्वा लाखाची कोणासाठी?लोकसभा निकालानंतर मी विधानसभेला उभे राहू नये. झाकली मूठ सव्वा लाखाची, असे माझ्याबद्दल बोलणाºया नेत्याचाच राजकीय ‘विनोद’ झाला आहे. त्यांना त्यांच्याच पक्षाने झाकली मूठ सव्वा लाखाची सल्ला दिला असावा. कोणी उभे राहावे, कोण निवडून येणार अन् कोण मुख्यमंत्री होणार हे जनता ठरवील. मी सत्तेत असो, नसो सतत लोकांमध्ये आहे. मला आरामाची गरज नाही. उलट भाजपाने माझ्यासमोर थकलेला उमेदवार उभा केला आहे. त्यांना मतदार नक्कीच आराम देतील.

सत्ताधाºयांनी पाच वर्षांत काहीच केले नाही का?नक्कीच केले आहे. आश्वासने दिली. भरमसाठ घोषणा केल्या. निवडणुकीच्या तोंडावर एक महिन्यात दोन हजार शासन निर्णय काढले. अंमलबजावणी शून्य असलेले हे सरकार कोणत्याही घटकाला खूश करू शकले नाही. शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, नोकरदार सर्वांना अडचणीत आणले आहे आणि हेच त्यांचे काम राहिले आहे. पाच वर्षात आधार कार्ड बनवा, तो मोबाईलला, पॅनला लिंक करा. बँकेत पैसे कमी ठेवले तर दंड भरा. रोजगार मागू नका, स्टेशनवर फ्री वायफाय घ्या, ही यांची कामे आहेत.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019chandrakant patilचंद्रकांत पाटीलSharad Pawarशरद पवार