शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
5
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
6
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
7
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
8
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
9
'क्रिस्टल ब्लॅक पर्ल' रंगात होंडा अमेझ भारतात लॉन्च; नव्या लूकमध्ये दिसते आणखी धासू!
10
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
11
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
12
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
13
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
14
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
15
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
16
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
17
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
18
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
19
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
20
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स

ज्यांना खड्डे बुजविता आले नाहीत, ते आमचे राजकारण काय संपविणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 06:18 IST

‘लोकमत’शी बोलताना माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ज्यांना रस्त्यावरचे खड्डे बुजविता आले नाहीत, ते विधानसभेनंतर शरद पवारांचे राजकारण संपणार, असे भाकित करीत आहेत.

- धर्मराज हल्लाळेभोकर (जि. नांदेड) : राजकारणात विचारांची लढाई अपेक्षित आहे, परंतु केंद्रात मिळालेल्या बहुमताने भाजपा अहंकारात बुडाली आहे. विरोधकांना शत्रू समजून संपविण्याची भाषा करू लागली आहे. त्यांना सत्तेची आलेली ही धुंदी जनता विधानसभेत उतरविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मला राजकारण सोडून आराम करण्याचा सल्ला देतात. अनुभवी ज्येष्ठ नेते असलेल्या शरद पवार यांचे राजकारणच संपणार म्हणतात, इतकी उन्मत्तपणाची भाषा मतदार सहन करणार नाहीत, असे सांगत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास व्यक्त केला.

‘लोकमत’शी बोलताना माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ज्यांना रस्त्यावरचे खड्डे बुजविता आले नाहीत, ते विधानसभेनंतर शरद पवारांचे राजकारण संपणार, असे भाकित करीत आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वर्षभरापूर्वी घोषणा केली होती, डिसेंबरनंतर रस्त्यावर खड्डा दिसणार नाही. वस्तुस्थिती मात्र भयंकर आहे. राज्यातील सुमारे ९० हजार किलोमीटर राज्यमार्गांपैकी निम्म्याहून अधिक रस्ते उद्ध्वस्त आहेत. राष्ट्रीय महामार्गाचेच चित्र जनतेसमोर मांडतात. गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे काय? प्रत्येक मतदारसंघात तालुक्यांना, जिल्ह्यांना जोडणाºया रस्त्यांची प्रचंड दुरवस्था आहे.घोषणा करण्यात पटाईत असलेल्या सरकारने पाच वर्षे जनतेची फसवणूक केली. गेल्या ४५ वर्षांतील बेरोजगारीचा उच्चांक भाजपा सरकारने गाठला. उद्योगधंदे बंद पडू लागले. नवीन नोकºया निर्माण झाल्या नाहीत. ज्या आहेत त्याही गमवाव्या लागल्या. मराठवाड्यातील औद्योगिक वसाहती मोडकळीस आल्या आहेत, हे या सरकारचे अपयश असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली.

भाजपाने वॉटर ग्रीडसारखी महत्त्वाकांक्षी योजना आणली आहे, ज्यामुळे मराठवाड्यात कायमच्या दुष्काळमुक्तीचा दावा आहे, हे मोठे काम नाही का?निवडणुकीच्या तोंडावरची ही घोषणा आहे. कथनी-करणीत फरक आहे. ऊर्ध्व पैनगंगा सिंचन प्रकल्पाचे पाणी मराठवाड्याला, त्यात नांदेड जिल्ह्यात मिळते. ते पाणी इतरत्र वळविण्याचा घाट सरकारने घातला आहे. ज्यामुळे १५ हजार हेक्टरवरील सिंचन क्षेत्राचे वाळवंट होईल.

दिवंगत नेते शंकरराव चव्हाणयांनी जायकवाडीसारखा प्रकल्प मराठवाड्याला दिला. ऊर्ध्व पैनगंगा, विष्णुपुरी, मांजरा, तेरणा हे सर्व प्रकल्प काँग्रेस नेत्यांच्या दूरदृष्टीने द्योतक आहे. काय काम उभे राहिले, हे जनतेसमोर आहे. फडणवीस सरकारच्या निव्वळ घोषणा आहेत. कोटींची उड्डाणे आहेत. एक कालवा जरी केला असेल तर त्यांनी सांगावे, असा प्रतिसवाल अशोक चव्हाण यांनी केला.

शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत मिळत आहे अन् तुम्ही म्हणता वाºयावर सोडले?कर्जमाफी जाहीर केली. सर्वांपर्यंत लाभ पोहोचले का? काही जणांना लाभ मिळाले की त्याचीच जाहिरातबाजी करायची. तुटपुंज्या मदतीचे काय बोलतात? शेतमालाच्या हमीभावाचे काय झाले, दुप्पट उत्पन्न करण्याचे काय झाले? फडणवीसांनी केलेली ही फसवणूक आहे. तूर, हरभरा, मूग खरेदी केंद्रांवरील रांगा आणि शेतकºयांचे हाल सर्वांसमोर आहेत. अनुदानासाठी जाचक अटी टाकल्या. ज्यामुळे लाखो शेतकºयांना अनुदानच मिळाले नाही.

झाकली मूठ सव्वा लाखाची कोणासाठी?लोकसभा निकालानंतर मी विधानसभेला उभे राहू नये. झाकली मूठ सव्वा लाखाची, असे माझ्याबद्दल बोलणाºया नेत्याचाच राजकीय ‘विनोद’ झाला आहे. त्यांना त्यांच्याच पक्षाने झाकली मूठ सव्वा लाखाची सल्ला दिला असावा. कोणी उभे राहावे, कोण निवडून येणार अन् कोण मुख्यमंत्री होणार हे जनता ठरवील. मी सत्तेत असो, नसो सतत लोकांमध्ये आहे. मला आरामाची गरज नाही. उलट भाजपाने माझ्यासमोर थकलेला उमेदवार उभा केला आहे. त्यांना मतदार नक्कीच आराम देतील.

सत्ताधाºयांनी पाच वर्षांत काहीच केले नाही का?नक्कीच केले आहे. आश्वासने दिली. भरमसाठ घोषणा केल्या. निवडणुकीच्या तोंडावर एक महिन्यात दोन हजार शासन निर्णय काढले. अंमलबजावणी शून्य असलेले हे सरकार कोणत्याही घटकाला खूश करू शकले नाही. शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, नोकरदार सर्वांना अडचणीत आणले आहे आणि हेच त्यांचे काम राहिले आहे. पाच वर्षात आधार कार्ड बनवा, तो मोबाईलला, पॅनला लिंक करा. बँकेत पैसे कमी ठेवले तर दंड भरा. रोजगार मागू नका, स्टेशनवर फ्री वायफाय घ्या, ही यांची कामे आहेत.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019chandrakant patilचंद्रकांत पाटीलSharad Pawarशरद पवार