शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकात ताटकळत बसणे थांबले; प्रत्येक बसचे कळणार ‘लाइव्ह लोकेशन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : लॉकडाऊननंतर प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने लालपरी आता हायटेक झाली असून, प्रत्येक बसचे लाइव्ह लोकेशन कळणार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : लॉकडाऊननंतर प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने लालपरी आता हायटेक झाली असून, प्रत्येक बसचे लाइव्ह लोकेशन कळणार आहे. त्यासाठी महामंडळाने व्हेकल ट्रॅकिंग सर्चिंग (व्हीटीएस) प्रणाली अस्तित्वात आणली आहे. डेपो, बसस्थानकातून गाडी सुटल्यानंतर प्रत्येक हालचालींवर या सिस्टीमद्वारे बसवर नियंत्रण राहणार आहे.

गाडीचा वेग, लोकेशन आणि थांबा या सिस्टीमद्वारे कळणार आहे. चालक बस हलगर्जीपणे चालवत असेल तर लागलीच वॉर्निंग बेल येते. थांबा नसताना बस थांबवली तर अलर्ट टोन येते. सिस्टीममधल्या या फायद्याच्या बाबींमुळे चालक-वाहकांच्या निष्काळजीपणालाही चाप बसणार आहे. गेल्या महिनाभरापासून या सिस्टीमद्वारे लातूर आगारात गाड्यांचे नियंत्रण सुरू झाले आहे.

लातूर आगारात ही सिस्टीम सुरू झाली असून, बसस्थानकामध्ये मोठा डिजिटल बोर्ड लागला आहे.

गाडी रफ चालविणे, विनाकारण थांबणे यामुळे गाड्या वेळेवर बसस्थानकात येतील व प्रवाशांची सोय होईल.

गाडीचे ब्रेक डाऊन झाले असेल, टायर पंक्चर झाले असेल याबाबतची माहितीही या सिस्टीममुळे कळते.

बसस्थानकात लागले मोठे स्क्रीन

व्हीटीएस प्रणालीचे बसस्थानकात मोठे स्क्रीन लागले असून, प्रवाशांना उदगीरहून येणाऱ्या गाडीची माहिती हवी असल्यास त्या गाडीचे लोकेशन या स्क्रीनवर कळणार आहे. त्यानुसार बस बसस्थानकात किती वेळात येऊ शकते, याचा अंदाज प्रवाशालाही बांधता येईल.

थांबा नसताना थांबा घेतला, गाडी रफ चालविली, विनाकारण ब्रेक लावला, या सर्व बाबी या सिस्टीममुळे स्क्रीनवर दिसतील. शिवाय, या संबंधाची वाॅर्निंग बेलही ही सिस्टीम देते.

रोजच्या रोज गाडीचे बुकिंग या सिस्टीममध्ये केले जाते. त्यात गाडीचा नंबर टाकला जातो. ड्रायव्हर, चालकाची माहिती त्यात असते. गाडी स्थानकातून सुटल्यापासून ती परत येईपर्यंत तिच्यावर नियंत्रण या सिस्टीमचे राहते.

चालक, वाहकांना कोठेही गाडी थांबवता येणार नाही

प्रवासी नसताना किंवा थांबा नसताना आता चालक, वाहकांना कोठेही गाडी थांबविता येणार नाही. कारण गाडी थांबल्याबरोबर थेट डेपोमध्ये आणि बसस्थानकात त्याची माहिती कळते.

आगार व्यवस्थापकांकडे त्याचा खुलासा चालक-वाहकांना करावा लागेल. त्यामुळे निर्धारित वेळ चालक-वाहकांना पाळावी लागेल.

प्रवाशांनाही आता बसस्थानकात गाडीची तासनतास वाट पाहण्याची गरज लागणार नाही. किती वेळात गाडी पोहोचेल याची इत्यंभूत वेळ या सिस्टीमद्वारे कळणार आहे.