शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या लाटेत ८१ गावांपर्यंत कोरोनाचा संसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:20 IST

उदगीर : कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी प्रशासन व नागरिकांनी वेळीच खबरदारी घेतल्याने तालुक्यातील ६४ गावांपर्यंत कोरोनाचा संसर्ग पसरला होता. मात्र, ...

उदगीर : कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी प्रशासन व नागरिकांनी वेळीच खबरदारी घेतल्याने तालुक्यातील ६४ गावांपर्यंत कोरोनाचा संसर्ग पसरला होता. मात्र, मध्यंतरी संसर्ग कमी झाल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिक बिनधास्त झाले. दरम्यान, दुसऱ्या लाटेत तालुक्यातील ८१ गावांपर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

पहिल्या लाटेत कोरोनाची लक्षणे व फैलाव कमी होता. तसेच गावागावांत जनजागृती करण्यात आली होती. नागरिकांत भीतीचे वातावरण होते. त्यामुळे नागरिकांकडून स्वयंस्फूर्तीने नियमांचे पालन झाले. पहिली लाट ओसरताच ढील मिळाली आणि नियमांचे उल्लंघन सुरु झाले. मास्क, सॅनिटायझर व फिजिकल डिस्टन्सकडे दुर्लक्ष करीत विवाह समारंभ सुरु झाले. गर्दीमुळे दुसऱ्या लाटेत संसर्ग वाढला.

शहरासह तालुक्यातील ८१ गावांत बाधित आढळले आहेत. नळगीर, अवलकोंडा, देऊळवाडी, नागलगाव, कौळखेड, तोंडचिर, हंडरगुळी, हाळी, तोंडार, वाढवणा खु., सुकणी, हंगरगा, मोर्तळवाडी, हेर, लोणी, मलकापूर, लोहारा, वाढवणा बुद्रूक, गुडसूर, एकुर्का रोड, डोंगरशेळकी, सोमनाथपूर आदी २२ मोठ्या गावात संसर्ग पोहोचला.

१४ गावे कोरोनापासून दूर...

तालुक्यातील वागदरी, बॉर्डर तांडा, गायमाय तांडा, वंजारवाडी, आडोळवाडी, करलेवाडी, गणेशवाडी, कुंभारवाडी, भाकसखेडा प., होनी हिप्परगा, पीरतांडा, आडोळ तांडा, अनुपवाडी आदी १४ गावांनी कोरोना संसर्ग रोखण्यात सध्या यश मिळविले आहे. दरम्यान, आठवडाभरापासून बाधितांची संख्या कमी झाली आहे.

कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढविले...

तालुक्यात पहिली लाट ६४ गावांपर्यंत पोहोचली होती. दुसऱ्या लाटेत ८१ गावांपर्यंत कोरोनाचा संसर्ग पसरला आहे. प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. ग्रामीण भागात कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. जाणीव जागृती, लसीकरण प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी घरीच राहून सहकार्य करावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत कापसे यांनी केले.

लक्षणे जाणवताच उपचार घ्यावेत...

पोलीस, महसूल, पालिका, आरोग्य कर्मचारी व ग्रामपंचायत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. नागरिकांकडून सहकार्य अपेक्षित आहे. विनाकारण रस्त्यावर फिरू नये. मास्क, सॅनिटायझर व फिजिकल डिस्टन्स या नियमांचे काटेकोर पालन करावे. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी अशी लक्षणे जाणवत असल्यास तत्काळ नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी, असे तहसीलदार रामेश्वर गोरे म्हणाले.

नागरिकांनी काळजी घ्यावी...

कोरोनाची पहिली लाट ओसरताच नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर कमी केला. लग्न व इतर कार्यक्रमात गर्दी होऊ लागली. त्यामुळे संसर्ग वाढला असल्याचे वाढवणा बुद्रूक येथील सरपंच नागेश थोंटे यांनी सांगितले.