शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शाळाबाह्य मुलांसाठी आजपासून शोधमोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:22 IST

शासनाच्या आदेशानुसार दरवर्षी ३० दिवसांपेक्षा जास्त दिवस शाळेत गैरहजर राहणाऱ्या मुलांना शाळाबाह्य गृहीत धरण्यात येऊन शिक्षक, बालरक्षकांमार्फत शोधमोहीम राबविण्यात ...

शासनाच्या आदेशानुसार दरवर्षी ३० दिवसांपेक्षा जास्त दिवस शाळेत गैरहजर राहणाऱ्या मुलांना शाळाबाह्य गृहीत धरण्यात येऊन शिक्षक, बालरक्षकांमार्फत शोधमोहीम राबविण्यात येते. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे शहरातील अनेक कुटुंबांनी आपले गाव जवळ केले आहे. स्थलांतरामुळे शाळाबाह्य मुलांचे प्रमाणही वाढले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील अशा शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने शोधमोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार १ ते १० मार्च या कालावधीत हा सर्वे होणार आहे.

या सर्वेक्षणाची जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गाेयल आणि शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी गटशिक्षणधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत सूचना केल्या आहेत. दरम्यान, उपशिक्षणाधिकारी विशाल दशवंत यांनी कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन केले. कार्यशाळेस डायट प्राचार्य अनिल मुरकुटे, डॉ. भागिरथी गिरी, आर. एन. गिरी, बालरक्षक समन्वयक सी. बी. ठाकरे, सतीश भापकर, रजिया शेख, दत्तात्रय माळकर, आर. एन. सूर्यवंशी, विवेक सौताडेकर आदी होते.

१० दिवसांत घेतला जाणार शोध...

सदरील सर्वेक्षण गावातील बसस्थानक, रेल्वेस्थानक, झोपडपट्ट्या, वीटभट्ट्या, दगडखाणी, फुटपाथ, हॉटेल तसेच विविध बालमजूर ठिकाणावर करण्यात येणार आहे. एकही शाळाबाह्य मूल या सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केल्या आहेत. १० दिवस ही मोहीम सुरु राहणार आहे.