शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
2
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
3
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
4
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
5
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
6
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
7
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
8
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
9
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
10
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
11
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
12
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
13
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
14
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
15
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
16
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
17
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
18
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
19
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
20
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
Daily Top 2Weekly Top 5

लातूर मेडिकल कॉलेजच्या ५० जागांवर टांगती तलवार, भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडून जागा रद्द करण्याची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 18:27 IST

भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने (एमसीआय) शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची तपासणी केली असता त्यात काही त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे एमसीआयने वाढीव देण्यात आलेल्या ५० एमबीबीएसच्या जागा रद्द करण्यासंदर्भात शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. परिणामी, लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ५० जागांवर टांगती तलवार आहे.

- हरी मोकाशे 

लातूर : भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने (एमसीआय) शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची तपासणी केली असता त्यात काही त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे एमसीआयने वाढीव देण्यात आलेल्या ५० एमबीबीएसच्या जागा रद्द करण्यासंदर्भात शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. परिणामी, लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ५० जागांवर टांगती तलवार आहे.लातुरात सन २००२ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना झाली. त्यावेळी येथे एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांची संख्या १०० अशी निश्चित करण्यात आली होती. दरम्यान, याच कालावधीत वैद्यकीय महाविद्यालयासाठी सर्वोपचार रुग्णालय निर्माण करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्याने वैद्यकीय शिक्षण घेणाºया मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची सोय झाली. त्याचबरोबर सर्वोपचार रुग्णालय असल्याने जिल्ह्याबरोबरच परजिल्ह्यातील रुग्णांना आरोग्य सुविधा मिळण्यास मदत झाली. सुरुवातीस या रुग्णालयात ५२० खाटा होत्या. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठीच्या आणखीन ५० जागा वाढवून मिळाव्यात, यासाठी प्रस्ताव सादर करून पाठपुरावा केला होता. त्यामुळे चार वर्षांपूर्वी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता वाढवून ती १५० अशी करण्यात आली होती. प्रवेश क्षमता वाढीवेळी आवश्यक त्या उपाययोजना महत्त्वाच्या होत्या. त्यानुसार काही सुविधा वाढविण्यात आल्या. प्रवेश क्षमता वाढल्याने भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडून दरवर्षी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची तपासणी केली जाते. त्यानुसार येथील वैद्यकीय महाविद्यालयाची ४ व ५ जानेवारी रोजी तपासणी करण्यात आली होती. या तपासणी दरम्यान प्राध्यापकांची संख्या १२.५ टक्क्यांनी कमी असणे निरीक्षणादिवशी महाविद्यालयात केवळ आठच शस्त्रक्रिया होणे, वैद्यकीय अधीक्षकांना प्रशासकीय अनुभव कमी असल्याच्या अशा त्रुटी दाखविण्यात आल्या होत्या. या त्रुटींची भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने गांभीर्याने दखल घेत सदरील त्रुटी दूर करण्यासाठी एमसीआयने एक महिन्याची मुदत दिली असली, तरी केंद्र सरकारकडे एमबीबीएसच्या वाढीव ५० जागा रद्द करण्यासंदर्भात फेब्रुवारी अखेरीस शिफारस केली आहे. त्यामुळे लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातील ५० जागांवर टांगती तलवार आहे. 

वैद्यकीय अधीक्षकांना अनुभव कमी... शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तपासणी दरम्यान काही त्रुटी आढळल्या आहेत. त्यात प्राध्यापकांची संख्या १२.५ टक्क्यांनी कमी असणे, वैद्यकीय अधीक्षकांना प्रशासकीय कामाचा अनुभव कमी असल्याने त्यांना या पदावर ग्राह्य धरता येणार नाही, या पदासाठी किमान १० वर्षांचा अनुभव महत्त्वाचा आहे. तपासणी दिवशी केवळ आठ शस्त्रक्रिया झाल्या होत्या. लेक्चर हॉलची संख्या कमी, सेंट्रल रिसर्च लॅबचा अभाव, आंतरवासिता विद्यार्थ्यांसाठी छोटे वसतिगृह, श्रवण तंत्रज्ञाचा अभाव अशा त्रुटी दाखविण्यात आल्या आहेत. 

एका तपासणीसाठी ३ लाखांचा खर्च... शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे एमसीआयकडून तपासणी करून घेण्यासाठी महाविद्यालयास ३ लाखांचा खर्च करावा लागतो. एमबीबीएसच्या ५० जागा वाढविण्यात आल्यानंतर आतापर्यंत ४ तपासण्या झाल्या आहेत. जानेवारीत झालेली शेवटची तपासणी होती. या तपासणीत मोठ्या प्रमाणात त्रुटी निघाल्या आहेत. 

मुदतीत आवश्यक ती उपाययोजना... एमसीआयच्या तपासणी दरम्यान काही त्रुटी आढळून आल्या आहेत. त्याची पूर्तता करण्यासाठी कालावधीही देण्यात आला आहे. या कालावधीत आवश्यक ती उपाययोजना करण्यात येईल. त्यामुळे प्रवेश क्षमता कमी होणार नाही, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी सांगितले.

टॅग्स :educationशैक्षणिकcollegeमहाविद्यालय