शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नळाचे पाणी शुद्ध; चाचण्यांचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:26 IST

लातूर शहरासाठी मांजरा प्रकल्पातून दररोज ४५ ते ५० एमएलडी पाणी उचलले जाते. या पाण्याचे शुद्धीकरण हरंगुळ व आर्वी येथील ...

लातूर शहरासाठी मांजरा प्रकल्पातून दररोज ४५ ते ५० एमएलडी पाणी उचलले जाते. या पाण्याचे शुद्धीकरण हरंगुळ व आर्वी येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये केले जाते. त्यानंतर प्रभागनिहाय पाण्याचे वितरण त्या-त्या जलकुंभाअंतर्गत करण्यात येते. पाणी वितरणासाठी शहरात दहा जलकुंभ आहेत. बार्शी रोड, शासकीय काॅलनी, सरस्वती काॅलनी, बसवेश्वर काॅलनी, डालडा फॅक्टरी, राजधानी, गांधी चौक, आर्वी, विवेकानंद चौक आदी जलकुंभांद्वारे वेळापत्रकानुसार पाण्याचे वितरण करण्यात येते. या जलकुंभाअंतर्गत दररोज पाच ते सहा पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. सदर पाणी पिण्यास योग्य अथवा अयोग्य, याची तपासणी केली जाते. पाण्यामध्ये जैविक घटक आहेत का, याचीही तपासणी होते. पाणी पिण्यास योग्य असल्याचा शेरा आल्यानंतरच त्याचे वितरण केले जाते, असे मनपा पाणी पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले. ज्या भागात पाणी सोडले जाणार आहे, त्या भागातील पाणी नमुन्यांची नियमित तपासणी केली जात असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कलवले यांनी सांगितले.

जलकुंभनिहाय घेतले जातात पाण्याचे नमुने

जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाण्याचे शुद्धीकरण झाल्यानंतरही पाणी नमुन्यांची तपासणी केली जाते. जलकुंभनिहाय पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. दररोज पाच ते सहा पाणी नमुन्यांची तपासणी केली जाते. पावसाळ्यात पाण्याचे नमुने अधिक घेतले जातात. खड्ड्यात साचलेले पाणी नळाच्या पाण्यात मिसळून अशुद्ध होऊ शकते. त्यामुळे पावसाळ्यात जास्त पाणी नमुन्यांची तपासणी केली जाते, जेणेकरून अशुद्ध पाण्याचा पुरवठा होणार नाही.

अशी हाेते तपासणी

पाण्याचा हार्डनेस तसेच कॅल्शियम व मॅग्नेशियमच्या प्रमाणाची तपासणी केली जाते. पाण्यातील जीवाणूजन्य संसर्ग घटकांची तपासणी केली जाते. पाण्यातील फ्लोराईडचे प्रमाणही तपासले जाते.

पाण्यातील या सर्व घटकांचे प्रमाण संतुलित आहे का, सदर पाणी पिण्यासाठी योग्य की अयोग्य, याबाबतची सर्व प्रक्रिया या तपासणीमध्ये केली जाते. त्याचा अहवाल पिण्यायोग्य आहे की नाही, हे पाहिल्यानंतरच पाण्याचे वितरण होते.

कोट

जलशुद्धीकरण केंद्रावर पाण्याचे शुद्धीकरण झाल्यानंतर त्या-त्या भागातील पाण्याचे नमुने पाणी पुरवठा विभागाच्या वतीने तपासणीसाठी घेतले जातात. शिवाय, आरोग्य विभागाच्या वतीनेही पाणी नमुन्यांची परस्पर तपासणी होते. या सर्व तपासण्यांच्या अहवालानुसार लातूरला दिले जाणारे पाणी १०० टक्के शुद्ध आहे.

- नागनाथ कलवले, कार्यकारी अभियंता, मनपा