शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सरत्या वर्षांत ऑनलाईन शिक्षणाला मिळाली चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:20 IST

मार्च महिना हा खरातर परीक्षांचा काळ. मात्र, कोरोनाच्या संंकटामुळे मार्चपासून लॉकडाऊन पुकारण्यात आले़ त्यामुळे शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात ...

मार्च महिना हा खरातर परीक्षांचा काळ. मात्र, कोरोनाच्या संंकटामुळे मार्चपासून लॉकडाऊन पुकारण्यात आले़ त्यामुळे शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली़ पहिली ते पदवीपर्यंतच्या परीक्षांवर अनिश्तितेचे सावट पसरले़ अभ्यासाला गती देण्यासाठी ७ एप्रिलपासून ऑनलाईन अभ्यासक्रम राबविण्यात आला़ दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका वेळेवर मिळाल्या नसल्याने निकालास विलंब लागला़ त्यातच पदवीच्या परीक्षांवरुन मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र होते़ नीट, जेईई, सीईटी परीक्षांवरही शाळा बंदचा परिणाम दिसून आला़ आता नियमांचे पालन करीत नववी ते बारावीचे वर्ग सुरु आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाचा मसूदा, वैद्यकीय प्रवेशाचे ७०:३० चे प्रादेशिक आरक्षण, नीट परीक्षा, दहावी, बारावीचा निकाल यासह अनेक घडामोडीमुळे २०२० हे वर्ष सर्वांच्याच स्मरणात राहणारे आहे़ कोरोनाने सरत्या वर्षांत केलेले सर्वच क्षेत्रातील नुकसान दिर्घकाळ परिणाम करणारे आहे़ त्यामुळे नव्या वर्षांत अधिक जोमाने यावर मार्ग काढत नवीन आव्हाने पेलण्याची ताकद अंगी निर्माण करावी लागणार आहे़

लातूरने दिला राज्याला ऑनलाईनचा पॅटर्न...

कोरोनाच्या संकटामुळे शाळा, महाविद्यालये बंद असताना लातूरातील सर्वच शाळा, महाविद्यालयांनी आॅनलाईनची प्रभावी अंमलबजावणी केली़ त्यामुळे लातूर ऑनलाईन पॅटर्नची राज्यभर चर्चा होती़ ऑफलाईनकडून अॉनलाईनकडे जाताना विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला़ मात्र, त्यावर मात करीत यशाची शिखरे विद्यार्थ्यांनी पादक्रांत केली़ दहावी, बारावी, नीट, जेईई, सीईटी या परीक्षेत लातूरचा दबदबा राज्यात कायम राहिला़

७०:३० प्रादेशिक आरक्षण रद्द...

वैद्यकीय प्रवेशासाठी राबविण्यात येणारे ७०:३० प्रादेशिक आरक्षण रद्द करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी घेतला़ त्यामुळे मराठवाडा आणि विशेषत: लातूर जिल्ह्यातील वैद्यकीय प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे़

विद्यापीठ पदवी परीक्षांचा गोंधळ...

राज्य सरकाराने पदवी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला़ मात्र, राज्यपालांच्या निर्णयानुसार परीक्षा घेण्याच्या सुचना मिळाल्यानंतर विद्यापीठ पदवी परीक्षांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते़