शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी सोयाबीन एक नवा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:15 IST

गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात काढणीच्या वेळेस अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन बियाणे भिजून उगवण क्षमता कमी झाली. अशा परिस्थितीत चालू खरीप हंगामात ...

गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात काढणीच्या वेळेस अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन बियाणे भिजून उगवण क्षमता कमी झाली. अशा परिस्थितीत चालू खरीप हंगामात सोयाबीनची मोठी गरज भासणार हे लक्षात घेऊन उन्हाळी सोयाबीन लागवडीचा यशस्वी प्रयोग निलंगा तालुक्यातील ७३ शेतकऱ्यांनी केला आहे.

तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे, मंडल कृषी अधिकारी रणजित राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली निलंगा तालुक्यातील ७३ शेतकऱ्यांनी एकशे पाच एकर क्षेत्रावर सोयाबीन लागवड करून अंदाजे ५५० क्विंटल दर्जेदार सोयाबीन बियाण्याचे उत्पादन घेतले आहे. नणंद येथील अभ्यासू व प्रगतशील शेतकरी प्रदीप मुकुंदराव नणंदकर यांनी कृषी सहाय्यक सुनील घारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादनाचा प्रयोग यावर्षी प्रथमच आपल्या शेतात केला. खरिपात दरवर्षी सदोष बियाण्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्येवर मात करण्यासाठी त्यांचा प्रयोग शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरला आहे. एकरी सव्वातेरा क्विंटलपर्यंत उन्हाळी सोयाबीनचे उत्पादन घेत त्यांनी खरिपासाठी दर्जेदार बियाणे तयार केले आहे. सोयाबीनसाठी उन्हाळी हंगामाच्या तुलनेत खरीप हंगाम अनुकूल मानला जातो, हा समज त्यांनी खोटा ठरवला आहे.

उन्हाळ्यात त्यांनी ‘फुले संगम’ या वाणाची १ फेब्रुवारी रोजी दोन एकर क्षेत्रात दोन ओळीतील अंतर १८ इंच ठेवून पेरणी केली. त्यासाठी त्यांना एकरी २५ किलो बियाणे लागले. बेसल डोसमध्ये डीएपी एकरी एक बॅग व एकरी दहा किलो गंधक दिले. तुषार सिंचनाद्वारे पाणी देऊन पेरणी केली. त्यानंतर फेब्रुवारी, मार्च महिन्यात दहा ते बारा दिवसांनी तर एप्रिल-मे महिन्यात दर आठवड्याला एक याप्रमाणे पाणी दिले. रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी शिफारशीत कीटकनाशकाची एक फवारणी केली. या प्रयोगात त्यांना एकरी सव्वातेरा क्विंटलपर्यंत बीजोत्पादन मिळाले.

सर्व बियाण्याचे झाले बुकिंग

नणंदकर म्हणाले की, खरीप २०२१साठी माझ्याकडील सर्व बियाण्याचे बुकिंग झाले आहे. प्रतिक्विंटल नऊ हजार रुपये दर मिळाला आहे. उन्हाळी हंगामात कीडरोगाचे प्रमाण तुलनेने कमी असते. फवारणीचा खर्च खरिपाच्या तुलनेत कमी येतो. खरीप पेरणीसाठी एकरी बियाण्याचे प्रमाण वीस किलोपर्यंत ठेवता येते. कारण उन्हाळी सोयाबीन दाण्याचा आकार लहान असून, उगवणक्षमता ९० टक्केपर्यंत असते. एप्रिलमध्ये काढणीसाठी मजुरांची उपलब्धता असते. खरीप हंगामापेक्षा तुलनेने खर्च कमी येतो. सदोष बियाण्यामुळे निर्माण होणाऱ्या नुकसानाची जोखीम कमी करता येते.