शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

तिरू प्रकल्पाच्या डाव्या, उजव्या कालव्यास गळती, पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:18 IST

जळकोट : उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी येथील तिरु मध्यम प्रकल्पाच्या कालव्याच्या पाण्याचा लाभ जळकोट तालुक्यातील काही शेतकऱ्यांना होतो, परंतु ...

जळकोट : उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी येथील तिरु मध्यम प्रकल्पाच्या कालव्याच्या पाण्याचा लाभ जळकोट तालुक्यातील काही शेतकऱ्यांना होतो, परंतु सध्या या कालव्यास भेगा पडल्याने पाण्याची गळती होऊन अपव्यय होत आहे. त्यामुळे डाव्या व उजव्या कालव्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतक-यांकडून होत असून शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे धाव घेऊन साकडे घातले आहे.

हाळी हंडरगुळी येथील तिरु मध्यम प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याचे १९७२ मध्ये मातीकाम झाले आहे. या कालव्याचा लाभ जळकोट तालुक्यातील मंगरूळ, वाढवणा खु., डांगेवाडी, घाडगेवाडी, लाळी खु., येवरी, सोनवळा, बोरगाव, एकुर्का, डोंगर कोनाळी यासह परिसरातील १० ते १५ गावांतील शेतकऱ्यांना होतो. त्यामुळे या भागातील शेती ओलिताखाली येऊन पीक उत्पादन वाढण्यास मदत झाली आहे. त्यामुळे प्रकल्पाचे दोन्ही कालवे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहेत. या कालव्याचे मातीकाम असल्याने त्यास भेगा पडल्या आहेत. त्यामुळे कालव्याद्वारे पाणी सोडल्यानंतर पाण्याची गळती होऊन अपव्यय होत आहे. ही गळती रोखण्यासाठी शेतक-यांकडून सिमेंट काँक्रिटचे काम करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने होत आहे. त्यामुळे वाया जात असलेले लाखो लिटर पाण्याचा शेतीसाठी उपयोग होऊन १० हजार ते १५ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येईल, असे शिष्टमंडळाने सांगितले. जिल्हा बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे यांच्या नेतृत्वाखालीत शिष्टमंडळात शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगम टाले, महारुद्र पाटील, खादर लाटवाले, मुन्शी नाजमुद्दीन, इम्तियाज शेख आदी होते.

शेतकऱ्यांचे हित लक्षात घ्यावे...

शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन तिरु मध्यम प्रकल्पाचे दोन्ही कालवे सिमेंट काँक्रिटचे करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. दोन्ही कालव्याबरोबरच तिरु नदीवरील ७ बॅरेजेच्या कामास गती द्यावी, यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे जिल्हा बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे यांनी सांगितले.

तत्काळ सर्व्हे करण्याचे निर्देश...

कालव्यातून पाण्याचा अपव्यय होत असल्याने जवळपास १५ ते २० हजार हेक्टरवरील शेतीस फटका बसत आहे. त्यामुळे सिमेंट काँक्रिटचे कालवे निर्माण करावेत, अशी मागणी करण्यात आली असता पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी संबंधित विभागाला तत्काळ सर्व्हे करून बांधकाम करण्यात यावे असे निर्देश दिले आहेत. लवकरच हे काम करण्यात येईल, असे राज्यमंत्री बनसोडे म्हणाले.