शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

बीबीएफ पेरणीसाठी २२ गावांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर अनंतपाळ : खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बावीस गावचे दीड हजार शेतकरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरूर अनंतपाळ : खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बावीस गावचे दीड हजार शेतकरी बीबीएफ या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एक हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करणार आहेत. त्यासाठी तालुका कृषी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी गावांची आणि शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

शिरूर अनंतपाळ तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ३१ हजार २०८ हेक्टर्स असले तरी लागवडीसाठी उपयुक्त असणारी जमीन २९ हजार ७०० हेक्टर्स इतकी आहे. यापैकी ५ हजार हेक्टर्स बागायती जमीन असल्याने सर्वसाधारणपणे २८ हजार ५०० हेक्टर्सवर खरीप हंगामाची पेरणी करण्यात येणार आहे. यंदा खरीप हंगामाच्या पेरणीचा कृती आराखडा तालुका कृषी कार्यालयाकडून तयार करण्यात आला असून, २८ हजार ३८५ हेक्टर्सवर खरीप हंगामाच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पारंपरिक शेतीला फाटा देऊन प्रायोगिक तत्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात असल्याने यंदा खरिपाच्या पेरणीसाठी बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा, यासाठी तालुका कृषी कार्यालयाच्यावतीने शेतकऱ्याची बैठक घेण्यात आली. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा वापर करून आगामी खरीप हंगामाची पेरणी करण्यासाठी २२ गावांमधील दीड हजार शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

उत्पादन वाढीसाठी दुहेरी फायदा...

बीबीएफ तंत्रज्ञान म्हणजे रूंद सरी वरंबा पध्दत. या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होतो. जास्त पाऊस पडला तर पाण्याचा निचरा लवकर होतो. त्यामुळे पिकाचे नुकसान होत आहे नाही. शिवाय पाऊस कमी झाला तर सरीमध्ये थांबलेल्या पाण्याचा पिकाला उपयोग होतो.

हेक्टरी एक हजार रुपये अनुदान....

शिरूर अनंतपाळ तालुक्यात ४८ गावे आहेत. त्यापैकी २२ गावांतील शेतकऱ्यांची बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून पेरणी करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. यासाठी शासनाने पोखरा योजनेंतर्गत हेक्टरी एक हजार रुपये अनुदान जाहीर केले असून, एका शेतकऱ्याला दोन हेक्टरची मर्यादा दिली आहे. त्यामुळे एक हजार हेक्टर्सवर या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे, कृषी अधिकारी शिवप्रसाद वलांंडे यांनी सांगितले.