शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

"गोपीनाथ मुंडे व्हायचं, पण सुधारित आवृत्ती"; पंकजा मुंडेंनी जाहीर केली राजकीय प्रतिज्ञा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 19:51 IST

वारसा, संघर्ष आणि स्वाभिमान सांगणारे पंकजा मुंडेंचं भावनिक भाषण

लातूर : “अनेकजण म्हणतात की माझी कार्यपद्धती मुंडे साहेबांसारखी नाही. हो, तशी नाही… पण ती त्यांच्या अपेक्षेप्रमाणेच आहे. त्यांनी मला सांगितलं होतं, तुला गोपीनाथ मुंडे व्हायचं आहे, पण त्याची सुधारित आवृत्ती. आणि म्हणूनच मी स्वाभिमानाला धक्का न लावता राजकारण करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे.” अशा शब्दात मंत्री पंकजा मुंडे यांनी राजकारणातील त्यांची भूमिका स्पष्ट केली. लातूरमध्ये स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. या प्रसंगी त्या बोलत होत्या.

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, “माझ्या वडिलांनी स्पष्ट सांगितलं होतं, पंकजा, तू माझी वारस आहेस. हा वारसा केवळ संपत्ती किंवा पदाचा नव्हता, तर मूल्यांचा, स्वाभिमानाचा आणि जनतेच्या सेवाभावाचा होता. पण या वारशासोबत संघर्ष, कारस्थानं आणि अडचणीही माझ्या वाट्याला आल्या. पण वडिलांनी दिलेल्या वारशाला सुईच्या टोकाइतकाही धक्का लागू देणार नाही, हा माझा शब्द आहे.” अशी शब्दात मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

कधीही तुकडे उचलू नको, नेहमीच बेरजेचं राजकारण करवडिलांची शिकवण सांगताना पंकजा म्हणाल्या, “मुंडेसाहेबांनी मला कधी काय करायचं हे शिकवलं नाही, पण काय करू नये हे मात्र शिकवलं. कुणी टाकलेले तुकडे उचलायचे नाहीत, परिस्थितीसमोर कधी झुकायचं नाही, कुणाबद्दल द्वेष बाळगायचा नाही… आणि नेहमीच गणित बेरजेचं करायचं.” त्यांनी हेही नमूद केलं की, “हीच शिकवण देवेंद्र फडणवीस यांनीही पाळली, आणि म्हणूनच आज आपण सत्तेत आहोत.”

प्रवासभर वाटत होते काहीतरी चमत्कार होईलमुंडे साहेबांच्या निधनाच्या आठवणी सांगताना पंकजा भावुक झाल्या. “त्यावेळी मी दिल्लीला पोहोचले. तिथे माझ्यासाठी कुणी ओळखीचं नव्हतं… फक्त देवेंद्र फडणवीस उभे होते. त्यांना पाहताच मी रडू कोसळले. प्रवासभर मला आशा होती की काहीतरी चमत्कार होईल, आणि मुंडे साहेब उठून बसतील… पण ती आशा तुटली,” असे सांगताना त्यांचा आवाज दाटून आला.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसlaturलातूर