शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

औराद शहाजानी परिसरातील शेकडाे एकरावरील भाजीपाला मातीमाेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:20 IST

शेतकऱ्यांचा माल महाराष्ट्रासह शेजारच्या कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यात विक्रीसाठी पाठविला जाताे. तेथील बाजार दरही कोसळले आहेत. ...

शेतकऱ्यांचा माल

महाराष्ट्रासह शेजारच्या कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यात विक्रीसाठी पाठविला जाताे. तेथील बाजार दरही कोसळले आहेत. बाजारपेठेत नेलेल्या फळ आणि भाजीपाल्याचे वाहनभाडेही शेतकऱ्यांना पदरमाेड कारुन द्यावे, लागत आहे. भाजीपाला आणि फळबाग कच्चामाल असल्याने शेतात साठवून ठेवणेही शक्य नाही. त्यामुळे शेतात एकतर सडवने आणि दुसरा पर्याय कवडीमोल दरात बाजारपेठेत विक्री करणे आहे. याशिवाय इतर पर्याय शेतकऱ्यांच्या हातात नसल्याने आर्थिक काेंडी झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी कोराेना काळात देशाची आर्थिक घडीचा विकासदर कायम ठेवण्यासाठी हातभार लावल. आता त्याच शेतकऱ्याची अवस्था वाईट झाली आहे. बाजारपेठ बंद-सुरु, आठवडी बाजार बंद, हाॅटेल रेस्टाॅरंटही माेजक्याच वेळी सुरु आणि बंद हाेत असल्याने व्यवसाय आणि उलाढालीवर परिणाम झाला आहे. यंदा चांगला पाऊस झाला आहे. परतीच्या पावसाने शेतशिवारात जलसाठाही समाधानकारक झाल्याने लागवड वाढली आहे. परिणामी, शेकडो एकर शेतावरील खरबूज, टरबूज, पपई, द्राक्ष फळबागांसह भाजीपालामध्ये वांगे, टोमॅटो, शिमला, कोथिंबीर, दोडका, पत्तागोबी, फुलगाेबी, चवळी, वरणा, कांदा, बटाटे आदी पिके आज बाजारभाव पडल्याने शेतात जाग्यावरच कुजत आहेत. मजुरीचे भाव वाढले असून, वाढत्या इंधन दरवाढीमुळे बाजारपेठेत पुरवठा करणाऱ्या वाहनांचे भाडेही वाढले आहे.

वाहतुकीच्या वाहनभाड्यात झाली वाढ...

शेतकऱ्यांचा मालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी शेतातच टाकून देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आठवडी बाजार सुरु करण्याची मागणी हाेत आहे. वाढत्या कराेणामुळे जिल्हा प्रशासनाने आठवडी बाजारावर बंदी घातली असून, सदर आठवडी बाजार भाजीपाला पिकासाठी सुरु करावा, सोशल डिस्टंसिंग आणि शासकीय नियमांचे पालन करुन आम्ही तो बाजार चालवू, असे व्यापारी मिनाज बागवान म्हणाले. सदर बाजार बाजारपेठ प्रशासनाने काही वेळेत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकरी विठ्ठल अंचुळे यांनी केली आहे.

बाजारातील भाजीपाला दर...

सध्याला भाजीपाल्याचे दर काेसळले आहेत, यामध्ये वांगे ५ रुपये किलो, शिमला १० ते १५ रुपये किलाे, मिरची १० ते १५ रुपये, टोमॅटो २ रुपये किलो, शेवगा २० रुपये, कोथिंबीर ५ ते १० रुपये, फूलगोबी दोन ते अडीच रुपये किलाे, पत्तागाेबी २ रुपये, चवळी १० रुपये, वरणा १० रुपये, कांदे १२ ते १५ रुपये, बटाटे ५ ते १२ रुपये किलाे, लसून २५ ते ४० रुपये किलो असे दर आहेत. आगामी काळात या भाजीपाल्याचे दर आणखीन काेसळणार असल्याचे शेतकऱ्यांतून सांगितले जात आहे. एकीकडे बाजार बंद असल्याने, ग्राहक, खरीदार व्यापारीच फिरकत नसल्याचे चित्र सध्याल आहे. शिवाय, हॉटेल आणि रेस्टॉरंटची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे.

उभ्या पिकावर नांगर फिरवण्याची वेळ...

निलंगा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना बाजारातील मागणीच घटल्याने शेतातील भाजीपाल्यावर नांगर फिरविण्याची वेळ आली आहे. काही शेतकरी नांगर फिरवून हा भाजीपाला माेडून काढत आहेत. औराद येथील शेतकरी देवराव म्हेत्रे म्हणाले, मी फूलगोबी दीड एकरावर घेतली आहे. सदर फुलगाेबीची विक्रीच हाेत नसल्याने शेतातच मोडून टाकली आहे. या फुलगाेबीवर रोटावेटर फिरावला आहे. तर तगरखेडा येथील शेतकरी भागवत बिरादार म्हणाले, दोन महिन्यापासून टोमॅटोचे दर कोसळले आहेत. या रब्बी हंगामात सतत भाव पडल्याने उत्पादन खर्चही निघाला नाही. आता तार आणि काठी काढणे याचा खर्चही निघालेला नाही. टरबूज उत्पादक शेतकरी जमीर मुल्ला म्हणाले, दोन रुपये, तीन रुपये किलो भावाप्रमाणे टरबूज विक्री करण्याची वेळ आली आहे. फळबाजारातील भाव घसरल्याने टरबूज बाजारात नेऊन विक्री करणे परवडत नाही. यातून वाहतुकीचा खर्चही पदरी पडत नाही.