शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

उन्हाळ्यात पाण्याचे कसे होणार?  लातूरात ५ मध्यम प्रकल्पांत शिल्लक राहिला १२ टक्के जलसाठा!

By हरी मोकाशे | Updated: February 28, 2024 18:44 IST

गत पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने परतीच्या पावसावर आशा होती. परंतु, तीही फोल ठरली.

लातूर : गत पावसाळ्यात पावसाने वार्षिक सरासरीही न गाठल्याने आणि दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पाणीटंचाईची दाहकता अधिक गडद होऊ लागली आहे. जिल्ह्यातील आठपैकी तीन मध्यम प्रकल्प जोत्याखाली आहेत तर पाच प्रकल्पांमध्ये केवळ १२.४० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याचे कसे होणार? अशी चिंता ग्रामीण भागातील नागरिकांना लागली आहे.

गत पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने परतीच्या पावसावर आशा होती. परंतु, तीही फोल ठरली. त्यामुळे जिल्ह्यातील नद्या, ओढे-नाले वाहिले नाहीत. परिणामी, मध्यम, लघु प्रकल्पांत अपेक्षित जलसाठा झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील काही गावांना डिसेंबरपासून पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले. आगामी काळात पाणीटंचाई आणखीन तीव्र होण्याची भीती व्यक्त करत जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणासाठी उपाययाेजनात्मक कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच प्रकल्पातील पाणी आरक्षित केले आहे. फेब्रुवारीत पाणीटंचाई वाढली आहे.

जिल्ह्यातील ११८ गावे-वाड्या तहानल्या...तालुका - टंचाईग्रस्त गावेलातूर - १७औसा - ३०निलंगा - १४अहमदपूर - ३७चाकूर - ०२शिरूर अनं. - ०३उदगीर - ०३देवणी - ०२एकूण - ११८

२५ गावांना अधिग्रहणाचे पाणी...जिल्ह्यातील एकूण ११८ गावे आणि वाड्यांनी अधिग्रहणासाठी १६२ प्रस्ताव दाखल केले होते. पंचायत समितीच्या पाहणीनंतर ४ गावांचे ११ प्रस्ताव रद्द करण्यात आले. ८९ गावांचे १०३ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी २५ गावांना २८ अधिग्रहणांद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

आठ गावांची टँकरची मागणी...जिल्ह्यातील औसा तालुक्यातील लामजना, खरोसा, टाका, अहमदपूर तालुक्यातील टेंभुर्णी, फुलसेवाडी, जळकोट तालुक्यातील येलदरा आणि लातूर तालुक्यातील चिंचोली ब., महापूर या आठ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे या गावांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केला. त्यापैकी एका गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

मध्यम प्रकल्पांत १५ दलघमी पाणी...जिल्ह्यात एकूण आठ मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी तावरजा, व्हटी आणि तिरू मध्यम प्रकल्प जोत्याखाली आहेत. त्यामुळे तिथे उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नाही. उर्वरित पाच मध्यम प्रकल्पांत १५.१५३ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यात रेणापूर - २.४५१, देवर्जन - १.७३९, साकोळ - २.४७०, घरणी - ३.९७७ आणि मसलगा प्रकल्पात ४.५१६ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे.

सर्वाधिक साठा निलंगा प्रकल्पात...प्रकल्प - उपयुक्त पाणी (%)रेणापूर - ११.९२देवर्जन - १६.२८साकोळ - २२.५६घरणी - १७.७०मसलगा - ३३.२१एकूण - १२.४०

टॅग्स :WaterपाणीDamधरणlaturलातूर