शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात पाण्याचे कसे होणार?  लातूरात ५ मध्यम प्रकल्पांत शिल्लक राहिला १२ टक्के जलसाठा!

By हरी मोकाशे | Updated: February 28, 2024 18:44 IST

गत पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने परतीच्या पावसावर आशा होती. परंतु, तीही फोल ठरली.

लातूर : गत पावसाळ्यात पावसाने वार्षिक सरासरीही न गाठल्याने आणि दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पाणीटंचाईची दाहकता अधिक गडद होऊ लागली आहे. जिल्ह्यातील आठपैकी तीन मध्यम प्रकल्प जोत्याखाली आहेत तर पाच प्रकल्पांमध्ये केवळ १२.४० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याचे कसे होणार? अशी चिंता ग्रामीण भागातील नागरिकांना लागली आहे.

गत पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने परतीच्या पावसावर आशा होती. परंतु, तीही फोल ठरली. त्यामुळे जिल्ह्यातील नद्या, ओढे-नाले वाहिले नाहीत. परिणामी, मध्यम, लघु प्रकल्पांत अपेक्षित जलसाठा झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील काही गावांना डिसेंबरपासून पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले. आगामी काळात पाणीटंचाई आणखीन तीव्र होण्याची भीती व्यक्त करत जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणासाठी उपाययाेजनात्मक कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच प्रकल्पातील पाणी आरक्षित केले आहे. फेब्रुवारीत पाणीटंचाई वाढली आहे.

जिल्ह्यातील ११८ गावे-वाड्या तहानल्या...तालुका - टंचाईग्रस्त गावेलातूर - १७औसा - ३०निलंगा - १४अहमदपूर - ३७चाकूर - ०२शिरूर अनं. - ०३उदगीर - ०३देवणी - ०२एकूण - ११८

२५ गावांना अधिग्रहणाचे पाणी...जिल्ह्यातील एकूण ११८ गावे आणि वाड्यांनी अधिग्रहणासाठी १६२ प्रस्ताव दाखल केले होते. पंचायत समितीच्या पाहणीनंतर ४ गावांचे ११ प्रस्ताव रद्द करण्यात आले. ८९ गावांचे १०३ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी २५ गावांना २८ अधिग्रहणांद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

आठ गावांची टँकरची मागणी...जिल्ह्यातील औसा तालुक्यातील लामजना, खरोसा, टाका, अहमदपूर तालुक्यातील टेंभुर्णी, फुलसेवाडी, जळकोट तालुक्यातील येलदरा आणि लातूर तालुक्यातील चिंचोली ब., महापूर या आठ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे या गावांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केला. त्यापैकी एका गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

मध्यम प्रकल्पांत १५ दलघमी पाणी...जिल्ह्यात एकूण आठ मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी तावरजा, व्हटी आणि तिरू मध्यम प्रकल्प जोत्याखाली आहेत. त्यामुळे तिथे उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नाही. उर्वरित पाच मध्यम प्रकल्पांत १५.१५३ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यात रेणापूर - २.४५१, देवर्जन - १.७३९, साकोळ - २.४७०, घरणी - ३.९७७ आणि मसलगा प्रकल्पात ४.५१६ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे.

सर्वाधिक साठा निलंगा प्रकल्पात...प्रकल्प - उपयुक्त पाणी (%)रेणापूर - ११.९२देवर्जन - १६.२८साकोळ - २२.५६घरणी - १७.७०मसलगा - ३३.२१एकूण - १२.४०

टॅग्स :WaterपाणीDamधरणlaturलातूर