शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

उन्हाळ्यात पाण्याचे कसे होणार?  लातूरात ५ मध्यम प्रकल्पांत शिल्लक राहिला १२ टक्के जलसाठा!

By हरी मोकाशे | Updated: February 28, 2024 18:44 IST

गत पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने परतीच्या पावसावर आशा होती. परंतु, तीही फोल ठरली.

लातूर : गत पावसाळ्यात पावसाने वार्षिक सरासरीही न गाठल्याने आणि दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पाणीटंचाईची दाहकता अधिक गडद होऊ लागली आहे. जिल्ह्यातील आठपैकी तीन मध्यम प्रकल्प जोत्याखाली आहेत तर पाच प्रकल्पांमध्ये केवळ १२.४० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याचे कसे होणार? अशी चिंता ग्रामीण भागातील नागरिकांना लागली आहे.

गत पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने परतीच्या पावसावर आशा होती. परंतु, तीही फोल ठरली. त्यामुळे जिल्ह्यातील नद्या, ओढे-नाले वाहिले नाहीत. परिणामी, मध्यम, लघु प्रकल्पांत अपेक्षित जलसाठा झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील काही गावांना डिसेंबरपासून पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले. आगामी काळात पाणीटंचाई आणखीन तीव्र होण्याची भीती व्यक्त करत जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणासाठी उपाययाेजनात्मक कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच प्रकल्पातील पाणी आरक्षित केले आहे. फेब्रुवारीत पाणीटंचाई वाढली आहे.

जिल्ह्यातील ११८ गावे-वाड्या तहानल्या...तालुका - टंचाईग्रस्त गावेलातूर - १७औसा - ३०निलंगा - १४अहमदपूर - ३७चाकूर - ०२शिरूर अनं. - ०३उदगीर - ०३देवणी - ०२एकूण - ११८

२५ गावांना अधिग्रहणाचे पाणी...जिल्ह्यातील एकूण ११८ गावे आणि वाड्यांनी अधिग्रहणासाठी १६२ प्रस्ताव दाखल केले होते. पंचायत समितीच्या पाहणीनंतर ४ गावांचे ११ प्रस्ताव रद्द करण्यात आले. ८९ गावांचे १०३ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी २५ गावांना २८ अधिग्रहणांद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

आठ गावांची टँकरची मागणी...जिल्ह्यातील औसा तालुक्यातील लामजना, खरोसा, टाका, अहमदपूर तालुक्यातील टेंभुर्णी, फुलसेवाडी, जळकोट तालुक्यातील येलदरा आणि लातूर तालुक्यातील चिंचोली ब., महापूर या आठ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे या गावांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केला. त्यापैकी एका गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

मध्यम प्रकल्पांत १५ दलघमी पाणी...जिल्ह्यात एकूण आठ मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी तावरजा, व्हटी आणि तिरू मध्यम प्रकल्प जोत्याखाली आहेत. त्यामुळे तिथे उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नाही. उर्वरित पाच मध्यम प्रकल्पांत १५.१५३ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यात रेणापूर - २.४५१, देवर्जन - १.७३९, साकोळ - २.४७०, घरणी - ३.९७७ आणि मसलगा प्रकल्पात ४.५१६ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे.

सर्वाधिक साठा निलंगा प्रकल्पात...प्रकल्प - उपयुक्त पाणी (%)रेणापूर - ११.९२देवर्जन - १६.२८साकोळ - २२.५६घरणी - १७.७०मसलगा - ३३.२१एकूण - १२.४०

टॅग्स :WaterपाणीDamधरणlaturलातूर