शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनामुळे पिकांना बसतोय फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:32 IST

नागरसोगा : शेती पंपांसाठी महावितरणच्या वतीने भारनियमन करण्यात येत आहे. परिणामी, विहिरीत पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नसल्याने ...

नागरसोगा : शेती पंपांसाठी महावितरणच्या वतीने भारनियमन करण्यात येत आहे. परिणामी, विहिरीत पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नसल्याने ही पिके वाळत आहेत. २४ तासांपैकी केवळ ८ तासच वीजपुरवठा होत असून तोही रात्रीच्यावेळी असल्याने शेतक-यांना कसरत करावी लागत आहे.

यंदाच्या खरीप हंगामात अति पाऊस झाल्याने नगदी पीक असलेल्या सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हतबल झाले. मुसळधार पावसामुळे यंदा या भागातील पाणी पातळीत वाढ झाली असून विहिरी, तलाव तुडूंब भरले आहेत. त्यामुळे या भागात रबीचा पेरा वाढला आहे. सध्या शेतात खरीपातील तुरीचे पीक आहे. विहिरीत पाणी असतानाही शेतक-यांना शेतीला पाणी देणे कठीण झाले आहे.

महावितरणच्या वतीने दर महिन्यास भारनियमनाचे वेळापत्रक जाहीर केले जाते. त्यात दिवसा कमी व रात्री जास्त दाबाने वीज कृषीपंपाना मिळते. वेळापत्रक व विजेचा प्रवाह हा कागदोपत्रीच ठरत आहे. ग्रामीण भागात कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्यामुळे सातत्याने कृषीपंप बंद पडत आहेत. तसेच कृषी पंप जळण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे काही शेतक-यांनी अलिखित नियम केला असून एका बाजूचे शेतकरी एका दिवशी तर दुस-या बाजूचे शेतकरी दुस-या दिवशी वीजपंप सुरु करतात. त्यामुळे एकदिवसाआडा पिकांना पाणी द्यावे लागत आहे. परिणामी, पिके सुकत आहेत. येथील एक डीपी जळून महिना उलटला. मात्र, त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे विहिरीत पाणी असतानाही शेतक-यांना पिकांना पाणी देता येत नाही.

शेतक-यांचा जीव धोक्यात...

भारनियमनाचे वेळापत्रक वारंवार बदलत असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी कसरत करावी लागत आहे. रात्रीच्यावेळी पिकांना पाणी देण्यासाठी दोघांना शेतात जावे लागत आहे. दरम्यान, अंधारामुळे या परिसरातील दोन शेतक-यांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

शेतकरीच टाकतात फ्यूज...

महावितरणकडून पहिल्या आठवड्यात दुपारी ४.५ ते रात्री १२.५, दुस-या आठवड्यात रात्री १२.५ ते सकाळी ८.५, तिस-या आठवड्यात सकाळी ८.५ ते सायंकाळी ४.५ या वेळापत्रकानुसार शेती पंपांना वीजपुरवठा करण्यात येतो. दरम्यान, फ्यूज गेला अथवा वीजपुरवठा खंडित झाल्यास ती कामे शेतक-यांनाच करावी लागत आहेत.