शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

लोकनेते चंद्रशेखर भोसले यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:13 IST

क्रांती विद्यालयात श्रद्धांजली कार्यक्रम जळकोट : तालुक्यातील केकतसिदंगी येथील क्रांती माध्यमिक विद्यालयाच्या वतीने संस्थेचे संस्थापक सदस्य गोविंदराव पाटील गोंड ...

क्रांती विद्यालयात श्रद्धांजली कार्यक्रम

जळकोट : तालुक्यातील केकतसिदंगी येथील क्रांती माध्यमिक विद्यालयाच्या वतीने संस्थेचे संस्थापक सदस्य गोविंदराव पाटील गोंड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विठ्ठल चंदावार, विश्वनाथ इद्रांळे, विश्वनाथ चाटे, विठ्ठल चंदावार, राजीव पाटील,जे.के. कांबळे, अच्युतराव दळवे, प्रशासक धुळे, ग्रामसेवक भालके, तलाठी भंडारे, मनोहर गोंड, मच्छिंद्रनाथ हंगरगे, ज्ञानोबा केंद्रे, भानुदास केंद्रे, विठ्ठल केंद्रे, फुलारी, ज्ञानोबा चाटे, प्रेमराव चाटे, परशुराम केंद्रे, बापुराव हंगरगे, लक्ष्मण काबंळे, काशिनाथ इंद्राळे, मुख्याध्यापक विलास सिंदगीकर, अंकुश सिंदगीकर, अरुण काळे, कैलास पाटील गोंड, देविदास मरशिवणे, माधव सोनकांबळे, जगन्नाथ दळवे, रमेश केंद्रे, केशव दळवे, मोतिराम केंद्रे आदींची उपस्थिती होती.

शहराध्यक्षपदी बाळासाहेब पाटोदे यांची निवड

उदगीर : येथील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या शहराध्यक्षपदी बाळासाहेब पाटोदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे . निवडीबद्दल माजी आमदार सुधाकर भालेराव, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र तिरुके, नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, ओबीसी जिल्हा अध्यक्ष बापुराव राठोड, साईनाथ चिमेगावे, वसंत शिरसे, मनोज पुदाले, नगरसेवक ॲड. दत्ता पाटील, सभापती रामेश्वर पवार, नागेश आस्टुरे, पप्पू गायकवाड, आनंद साबणे, आनंद बुंदे, अमोल निडवडे, सागर बिरादार, विशाल रंगवाळ, आनंद भोसले, विरलाल कांबळे आदींनी कौतुक केले आहे.

क्षीरसागर, मसुरे यांची निवड

हंडरगुळी : उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील संतोष क्षीरसागर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी, तर हाळी येथील रहिवासी सिद्धार्थ मसुरे यांची युवक तालुका सहसचिवपदी निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रोहिदास कुंडगीर यांच्या हस्ते देण्यात आले. निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर आदींसह पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

जिल्ह्यात पावसाअभावी पेरण्या रखडल्या

लातूर : जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने जवळपास ५५ टक्के क्षेत्रावरील खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. सोयाबीनसाठी ४ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून, आतापर्यंत केवळ १ लाख ५० हजारांहून अधिक हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. दरम्यान, हवामान विभागाचा अंदाज फोल ठरल्याने पहिल्या पावसावर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. जिल्ह्यात ६ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी अपेक्षित आहे. मात्र, अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

मुख्य रस्त्यावरील दुभाजकात कचरा

लातूर : शहरातील मुख्य रस्त्यावरील दुभाजकात कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रेणापूर नाका, बार्शी रोड, औसा रोड आदी भागातील रस्त्यावरील दुभाजकात कचरा टाकला जात आहे. नियमित कचरा संकलनासाठी घंटागाडी येत नसल्याने नागरिक दुभाजकात कचरा टाकत आहेत. याकडे मनपाच्या स्वच्छता विभागाने तत्काळ लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.