शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यात पुरात चौघे वाहून गेले; पाटोदा माळहिप्परगा ओढ्यावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 23:54 IST

जळकोट तालुक्यातील तिरु नदी, पाटोदा (खु.), माळहिप्परगा ओढ्यावरील घटना

राजकुमार जाेंधळे, जळकोट (जि. लातूर) : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून, जळकोट तालुक्यात मंगळवारी चौघेजण वाहून गेले आहेत. तिरु नदीमध्ये २८ वर्षीय तरुण तर पाटोदा (खु.) आणि माळहिप्परगा ओढ्याच्या पुलावरून जाताना ऑटो उलटला. त्यात केंद्रीय राखीव दलाची महिला पोलिस कर्मचारी व अन्य दोघे असे तिघेजण वाहून गेले.

ही घटना मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. माळहिप्परगा येथून पाटोदा मार्गे उदगीरकडे ऑटो निघाला होता. वाटेत ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहत होते. रिक्षाचालक संग्राम मरिबा सोनकांबळे (वय ३५) यांना पाण्याचा अंदाज आला नाही. अंधार असल्याने रिक्षा पाण्यात उलटली. पाण्याचा प्रवाह जोरदार होता. त्यात रिक्षातील केंद्रीय राखीव पोलिस दलाची महिला कर्मचारी सूर्या उर्फ संगीता सूर्यवंशी (वय ३२, रा. माळहिप्परगा), वैभव पुंडलिक गायकवाड (२४, रा. नरसिंगवाडी), विठ्ठल धोंडिबा गवळे (५०, रा. पाटोदा बु.) हे तिघे वाहून गेले. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू होते. तर रिक्षाचालक संग्राम मरिबा सोनकांबळे, बंटी उर्फ राकेश वाघमारे हे दोघेही झुडपांना धरून बचावले आहेत.

तर तिरु नदीवरून सुदर्शन घोणशेट्टे हा तरुण सकाळी १० वाजता वाहून गेला आहे. या चारही जणांचा शोध रात्री उशिरापर्यंत लागलेला नव्हता. आपत्ती व्यवस्थापनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. बचाव कार्यासाठी रामचंद्र पाटील, ग्रामसेवक फेरोज शेख, तलाठी आकाश पवार, सुधाकर बुके, परशुराम जानतिने, पोलिस पाटील फेरोज सिद्दीकी, धोंडिराम राठोड यांच्यासह दोन्ही गावांतील तरुण घटनास्थळी धावले आहेत. दरम्यान, तहसीलदार राजेश लांडगे, पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण यांच्यासह पथक दाखल झाले आहे. दोन्ही गावांतील पाचशेपेक्षा अधिक जमाव नदीच्या काठावर जमला आहे.

सूर्या उर्फ संगीता दिल्लीला निघाल्या होत्या...

सूर्या उर्फ संगीता सूर्यवंशी या केंद्रीय राखीव पोलिस दलात सेवेमध्ये होत्या. त्या सुटीसाठी गावी आल्या होत्या. दरम्यान, सेवेत रूजू होण्यासाठी मंगळवारी त्या उदगीरमार्गे दिल्लीला जाणार होत्या. त्यासाठी गावातून आपल्या बहिणीच्या मुलासमवेत रिक्षाने उदगीरकडे जात होत्या. रस्त्यात ओढ्याला आलेल्या पुरामध्ये रिक्षा वाहून गेली. त्यात चालकासह पाच जण होते. तिघांचा पत्ता लागला नाही. तर दोघे बचावले आहेत.

बचावकार्य वेगात, मदत पाेहचवू : माजी मंत्री बनसाेडे...

अतिवृष्टी झाली आहे. नदी-नाले, ओढे ओसंडून वाहत आहे. अनेक पुलावरुन पाणी चालले आहे. काेणीही अनावश्यक धाडस करुन पाण्याच्या प्रवाहातून वाहने नेऊ नयेत, असे आवाहन माजी मंत्री आ. संजय बनसाेडे यांनी केले आहे. ते म्हणाले, जळकाेट तालुक्यात आतापर्यंत चार जण वाहून गेले आहेत. त्यांचे शाेधकार्य सुरु असून, संबंधितांच्या कुटुंबीयांना याेग्य ती मदत केली जाईल. शासन, प्रशासन तुमच्या साेबत आहे, असेही आ. बनसाेडे म्हणाले.

टॅग्स :riverनदी