शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्र परवान्याचीही फॅशन; जिल्हाभरात ८९० परवाने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:25 IST

लातूर अन् उदगीरमध्ये सर्वाधिक शस्त्र परवाने राजकुमार जोधळे / लातूर : स्वसंरक्षण आणि शेतीसंरक्षण या दोन प्रमुख कारणांसाठी शस्त्राचे ...

लातूर अन् उदगीरमध्ये सर्वाधिक शस्त्र परवाने

राजकुमार जोधळे / लातूर : स्वसंरक्षण आणि शेतीसंरक्षण या दोन प्रमुख कारणांसाठी शस्त्राचे परवाने दिले जातात. यात शिवारातील श्वापदापासून आणि काही व्यक्तींकडून जीविताला धोका असल्याच्या कारणावरून अनेकांनी शस्त्र परवाना घेतला आहे. जिल्ह्यातील एकूण ८९० शस्त्रांपैकी लातूर आणि उदगीर तालुक्यात सर्वाधिक शस्त्र परवान्याची संख्या आहे.

लातूर जिल्ह्यातील एकूण १० तालुक्यात ८९० जणांनी शस्त्र परवाना घेतला आहे. दरवर्षी पोलीस प्रशासनाकडे शस्त्र परवान्यासाठी प्रस्ताव दाखल होतात. यातील कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर वाटणारी गरज याचाही अभ्यास केला जातो. योग्य कारण असेल, शस्त्राची खरेच गरज असेल तर असे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविले जातात.

शस्त्र बाळगताना शेती रक्षणासाठी १२ बोअरच्या बंदुकीला परवानगी दिली जाते. स्वसंरक्षणासाठी रिव्हाल्व्हर आणि पिस्टल अशा दोन प्रकारच्या बंदुकीला परवानगी देण्यात येते. हे शस्त्र सार्वजनिक ठिकाणी काढता येत नाही. दहशत पसरविण्यासाठी उपयोग करता येत नाही. ते परवानाधारकाच्या आत्मसंरक्षणासाठी असते. अशा शस्त्राना फारच काळजीपूर्वक वापरावे लागते.

शस्त्र परवाना काढायचा कसा?

शस्त्र परवाना काढताना जिल्हाधिकारी कार्यालयात त्यासंदर्भातील ठोस असे पुरावे, कारण द्यावे लागते. त्यानंतरच शस्त्र आवश्यक आहे का, यावर सुनावणी होते. एकंदरीत पोलिसांचा अहवाल आणि सुनावणीनंतर परवाना दिला जातो.

लातूर शहरात सर्वाधिक परवाने...

जिल्ह्यात एकूण सहा उपविभाग आहेत. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रासाठी अर्ज दाखल केले होते.

सर्व अर्जाची छाननी, पडताळणी केल्यानंतर, शस्त्राची गरज का आहे, याची शक्यता पडताळूनच प्रस्तावांना मंजुरी दिली जाते. यातूनच हौसी मंडळींना छान बसला आहे.

लातूर जिल्ह्यातील सहा उपविभागात लातूर आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ उदगीर आहे. लातूरमध्ये ४५१ तर उदगीरात १०० जणांनी शस्त्र परवाना घेतला आहे.

कठोर नियमांनी रोखले अनेक हौसी मंडळींना...

जीविताला धोका असणाऱ्या व्यक्तीला शस्त्र परवाना देताना प्राधान्य दिले जाते. यापूर्वी त्यांच्यावर खरेच प्राणघातक हल्ला झाला होता का, यासह इतर कारण तपासले जाते.

प्रस्ताव दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक यांच्याकडे सुनावणी होते. त्यानंतर आलेल्या अहवालाचा विचार करून जिल्हा प्रशासन शस्त्र परवाना देण्याचा निर्णय घेतात.

अधिकारी वर्गातही वाढत आहे क्रेझ...

शस्त्र परवाना मिळवण्यासाठी आता महसूल विभागातील अधिकारी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. वाळू माफियापासून दंडाधिकाऱ्याचा दर्जा असणारे अधिकारी शस्त्र परवाना मागत आहेत. गत पाच वर्षात अनेक अधिकाऱ्यांनी आपले प्रस्ताव दाखल केले आहेत.

पाच वर्षात पात्र नागरिकांना परवाना...

परवाना मागण्याचा अधिकार काही निवडक प्रकरणातच देण्यात आला आहे. आलेल्या आर्जावर निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हा प्रशासनाला आहे.

जिल्ह्यातील अनेक प्रस्तावावर सुनावण्या घेण्यात आलेल्या आहेत. सुनावणीत ठोस कारण आणि पुरावा सादर न करणाऱ्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले आहेत.

शस्त्र सांभाळणे झाले कठीण...

१) शस्त्राचा परवाना मिळाल्यानंतर त्याचे सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शन करता येणार नाही. याबाबत अधिक काळजी घ्यावी लागते. शस्त्राचा गैरव्यवहार होणार नाही, हेही पाहिले पाहिजे.

२) परवाना दिल्यानंतर शस्त्रांच्या गोळ्या किती दिल्या आहेत, याची संख्या आणि अहवाल प्रशासनाकडे सादर करावा लागतो.

३) शस्त्र परवान्याचे नूतनीकरण दर तीन वर्षांनी करावे लागते. परवाना दिलेल्या कालावधीत शस्त्राचा गैरवापर केल्याचे आढळून आल्यास शस्त्र परवाना रद्द करण्यात येतो.