शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची उघडीप, कोवळी पिके वन्यप्राण्यांकडून फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:15 IST

औसा तालुक्यातील बेलकुंड परिसरात मृगाच्या प्रारंभी चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. शेतकऱ्यांनी महागडे बी- बियाणे, खते खरेदी ...

औसा तालुक्यातील बेलकुंड परिसरात मृगाच्या प्रारंभी चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. शेतकऱ्यांनी महागडे बी- बियाणे, खते खरेदी करून खरिपाची पेरणी करण्यास सुरुवात केली. मृगात पेरणी झाल्यास पीक चांगले येते आणि उत्पादन चांगले मिळते, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. दरम्यान, पिकेही उगवली आहेत. परंतु, गेल्या आठवड्यापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे कोवळी पिके कोमेजू लागली आहे. शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी पिके वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत. दरम्यान, हरणांचे कळप कोवळ्या पिकांवर ताव मारून ते फस्त करीत आहेत. तसेच रानडुकरे पिकांची नासधूस करीत आहेत. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

आठवडाभरात पाऊस न झाल्यास उगवलेली पिके जळून जाण्याची भीती आहे. त्याचबरोबर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेतकरी वन्यप्राण्यांपासून पिकांचा बचाव करण्यासाठी रात्रीच्यावेळी शेतात थांबत असल्याचे पहावयास मिळत आहे.

ढग येतात दाटून...

मृगाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने पेरणी आटोपली. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने अंकुरलेली पिके आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, पाऊस गायब झाला आहे. पाऊस येईल, असे वातावरण निर्माण होते, परंतु सायंकाळच्या सुमारास आलेले ढग न बरसताच निघून जातात.

शेतकऱ्यांची चिंता वाढली...

जूनच्या सुरुवातीस चांगला पाऊस झाल्याने सोयाबीनची पेरणी केली. पीकही उगवले. परंतु, पावसाने दडी मारल्याने सिंचनाद्वारे पीक वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशातच वन्यप्राणी रात्रीच्या सुमारास उगवलेले पीक फस्त करीत आहेत. त्यामुळे रात्रभर जागरण करून पिकांचे रक्षण करावे लागते. सध्या पावसाची प्रतीक्षा आहे.

- सुरज पाटील, शेतकरी, बेलकुंड.