शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पीकविम्यासाठी ७२ तासांत अर्ज करण्याची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 17:18 IST

प्रधानमंत्री पीकविमा योजनेत नुकसानीनंतर ७२ तासांत ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करण्याची सक्ती करण्यात आल्यामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. नेमका अर्ज कसा भरावा, कोठे द्यावा, या संदर्भात कसलेही मार्गदर्शन प्रशासनाकडून करण्यात आलेले  नाही. त्यामुळे  शेतकऱ्यांना  हा अर्ज  भरणे हेच मोठे संकट वाटत आहे.

लातूर : अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील खरीप पिकांचे नुकसान झाले असून, त्याचे पंचनामे अद्यापही सुरू झालेले नाहीत. तर दुसरीकडे मात्र प्रधानमंत्री पीकविमा योजनेत नुकसानीनंतर ७२ तासांत ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करण्याची सक्ती करण्यात आल्यामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे.

मागील आठवड्यामध्ये जिल्ह्यात सर्वदूर अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीत देवणी, निलंगा, औसा, जळकोट, उदगीर व लातूर तालुक्यातील काही भागांमध्ये सोयाबीन पिक पाण्यात वाहून गेले. शेंगांना झाडांवरच कोंब फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

त्यामुळे आता पीकविमा मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र या योजनेत आता नुकसानीनंतर ७२ तासांमध्ये ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज करण्याची सक्ती करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा मिळेल का, याचीच चिंता वाटत आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील साडेचार लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे. दोन दिवसांपूर्वी प्रशासनाने पिक विमा अर्ज डाऊनलोड करून त्यावर माहिती भरण्याचे आवाहन केले आहे. नेमका अर्ज कसा भरावा, कोठे द्यावा, या संदर्भात कसलेही मार्गदर्शन प्रशासनाकडून करण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना हा अर्ज भरणे हेच मोठे संकट वाटत आहे.

त्यामुळे महसूल विभागांतर्गत सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, जेणेकरून रबी पेरण्यांसाठी शेतकऱ्यांना फायदा होईल, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

टॅग्स :laturलातूरCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी