शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

हक्काच्या निवाऱ्याअभावी १२०० कर्मचाऱ्यांची परवड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : जिल्हा पाेलीस दलातील बहुतांश कर्मचाऱ्यांची लाईफ स्टाईलच बदलली आहे. परिणामी, बंदाेबस्तावर असलेल्या कर्मचाऱ्यांना वेळेची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : जिल्हा पाेलीस दलातील बहुतांश कर्मचाऱ्यांची लाईफ स्टाईलच बदलली आहे. परिणामी, बंदाेबस्तावर असलेल्या कर्मचाऱ्यांना वेळेची मर्यादाही राहिली नाही. अनेकांना कुटुंबांना वेळ देणेही शक्य हाेत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. ना वेळाचा ना वेतनाचा मेळ बसत आहे.

लातूर जिल्हा पाेलीस दलात कार्यरत असलेल्या आणि ५० वर्षे ओलांडलेल्या कमर्चाऱ्यांकडे अद्यापही हक्काचा निवारा नाही. परिणामी २ हजार १११ पैकी तब्ब्ल १ हजार २०० पाेलीस कर्मचारी कुटुंबीयांची निवाऱ्याअभावी परवड सुरूच आहे. याकडे शासनाचेही दुर्लक्ष हाेत आहे.

लातूर जिल्हा पाेलीस दलात एकूण कर्मचाऱ्यांपैकी ६० टक्के कर्मचाऱ्यांना निवासस्थान उपलब्ध नसल्याने, अनेकांना भाड्याच्या घरात वास्तव्य करावे लागत आहे. तर शासकीय निवासस्थानांची, वसाहतींची माेठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. तर काही ठिकाणी निवासस्थानांच्या भिंतींना तडे गेले आहेत. अशा स्थितीत पाेलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे वास्तव्य गत अनेक वर्षांपासून सुरूच आहे. दरवर्षी नव्याने वसाहतींच्या दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाताे. मात्र, निर्णय काही हाेत नाही.