शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

बसच्या २३ चालकांची विनाअपघात सेवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:25 IST

लातूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागामध्ये सद्यस्थितीत ९७२ चालक कार्यरत आहेत. यातील २५ वर्षे सेवा झालेल्या २३ ...

लातूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागामध्ये सद्यस्थितीत ९७२ चालक कार्यरत आहेत. यातील २५ वर्षे सेवा झालेल्या २३ जणांनी विनाअपघात प्रवासी ने-आण करण्याचे कर्तव्य बजावले आहे. तर सेवानिवृत्त झालेल्या अन्य २३ जणांनी विनाअपघात सेवा दिली आहे.

निलंगा आगारातील वाय.डी. कांबळे आणि संजय मसलगे या दोन चालकांची तर ३० वर्षे सेवा झाली आहे. आता दोघेही सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. विनाअपघात सेवा दिल्याबद्दल त्यांना नुकतेच गौरविण्यात आले. सद्यस्थितीत २३ जण विनाअपघात सेवा दिलेले चालक आहेत. तर २०१४ पूर्वी २३ जणांनी विनाअपघात कर्तव्य बजावले होते. विनाअपघात सेवा बजावलेल्या सर्व चालकांचा महाराष्ट्र दिनी महामंडळाकडून गौरव होणार असल्याचे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी सांगितले.

अपघाताचे तीन प्रकार महामंडळाकडून नोंदविले जातात. मरणांतर, गंभीर आणि किरकोळ. या तिन्ही प्रकारांत प्रस्तुत २३ चालकांचा समावेश नाही. साधा किरकोळ अपघातही या २३ चालकांकडून झालेला नाही. दरम्यान, गतवर्षी लाॅकडाऊन असल्यामुळे फक्त ४६ अपघात एसटी महामंडळाच्या चालकांकडून झाले आहेत. यात मरणांतर चार ते पाच अपघात असून, उर्वरित सर्व अपघात किरकोळ स्वरुपाचे आहेत. तथापि, एसटीचा प्रवास सामान्यांसाठी सुखकर आहे.

एस.टी. महामंडळामध्ये ३१ वर्षांपासून सेवा बजावत आहे. जूनमध्ये सेवानिवृत्ती आहे. शांत, संयम ठेवून गाडी चालविल्यास अपघात होत नाही. घरातील काही तणाव असतील तर ते विसरून कामावर आले पाहिजे. त्यासाठी शांत आणि संयम राखायला हवा. तरच आपण विनाअपघात सेवा देऊ शकू. अनेक चालकांच्या घरगुती समस्या असतात. त्या तणावातच ड्युटीवर आल्यावर लक्ष विचलित होऊन अपघात होऊ शकतात. नव्या चालकांनी आमच्या अनुभवाचा हा मंत्र ध्यानी घ्यावा.

- वाय.डी. कांबळे, निलंगा आगार

२९ वर्षांपासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा चालक म्हणून मी कार्यरत आहे. सहा महिन्यानंतर मी सेवानिवृत्त होत आहे. महामंडळातील २९ वर्षे आणि त्यापूर्वी मी गाडी चालवीत आहे. बस किंवा गाडीमध्ये जे प्रवासी आहेत, ते आपले कुटुंब आहे. या कुटुंबाचा सुरक्षित प्रवास झाला पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे या भावनेतून मी दररोज ड्युटी करतो. एस.टी.ची स्टेअरिंग हातात घेताच हीच भावना दररोज होते.

- संजय मसलगे, निलंगा आगार