शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

धनेगाव बॅरेजेसमध्ये ५१ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:20 IST

वलांडी : देवणी तालुक्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांजरा नदीवरील निलंगा, देवणी तालुक्याच्या सीमेवर उभारण्यात आलेल्या धनेगाव येथील उच्चस्तरीय ...

वलांडी : देवणी तालुक्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांजरा नदीवरील निलंगा, देवणी तालुक्याच्या सीमेवर उभारण्यात आलेल्या धनेगाव येथील उच्चस्तरीय बॅरेजेसमध्ये यावर्षी सद्यस्थितीत ५१.४५ टक्के पाणीसाठा असून, शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. या प्रकल्पातून कार्यान्वित करण्यात आलेल्या हेळंब व शिऊर या दोन गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून, धनेगाव धरणाची साठवण क्षमता ११.३११ दशलक्ष घनमीटर असून, आजघडीस धरणात ५१.४५ टक्के पाणी उपलब्ध आहे.

पावसाळ्यापूर्वी या धरणात २.९० दशलक्ष घनमीटर पाणी होते. धरणाची उंची ८.५ मीटर असून, धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास गिरकचाळ कोल्हापुरी बंधारा पाण्याखाली जातो, तर हेळंब धनेगाव जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे काम चालू असल्याने यावर्षी ८ मीटर पाणी थांबविण्यात येणार असल्याची माहिती शाखा अभियंता मल्लिकार्जुन पाटील यांनी दिली. या प्रकल्पामुळे १४.८६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली असून, त्यात धनेगाव, शिरूर, हेळंब, वळसांगवी, शिरोळ, वांजरवाडा, हिसामनगर, गिरकचाळ, जवळगा, टाकळी, वलांडी, बसपूर, बाकली, कवठाळा, घुगी, सांगवी, साकोळ, उजेड, निटूर या गावांचा समावेश आहे. या प्रकल्पाचे शून्य पॉईंट डोंगरगाव असून, धरणात गतवर्षीपासून पूर्ण क्षमतेने पाणी थांबविण्यात येत आहे. या धरणात होत असलेल्या पाणीसाठ्यामुळे परिसरातील वलांडी, जवळगा, धनेगाव, टाकळी, हेळंब, माटेगडी या गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली आहे. वलांडी महसूल मंडलात गतवर्षी ३५० हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली होती. यावर्षी त्यात वाढ होऊन १ हजार ११५ हेक्‍टरवर उसाची लागवड करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाचे विनायक सूर्यवंशी यांनी दिली. धरण क्षेत्रात पाणी थांबल्याने वलांडी परिमंडलातील विहिरी, बोअरवेलची पाणीपातळी वाढली आहे. धरण क्षेत्रातील भागात मोठा पाऊस झाल्यास धनेगाव बॅरेज पूर्ण क्षमतेने भरण्यास मदत होणार आहे.

पुलाचे काम तत्काळ करण्यात यावे...

धनेगाव उच्चस्तरीय बंधाऱ्याच्या बुडीत क्षेत्रातील धनेगाव, हेळंब रस्त्यावरील पुलाचे उर्वरित काम तत्काळ करावे. कामाला बाधा ठरत असलेल्या पाण्याची पातळी कमी करण्याची मागणी धनेगाव व हेळंब ग्रामपंचायतीसह शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.

धनेगाव बॅरेजमध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होणार आहे. त्यामुळे पाण्याच्या पलीकडे असलेल्या जमिनीत शेती कसणे शेतकऱ्यांना जिकरीचे झाले आहे. यासाठी धनेगावकरांना १० किमीचा पल्ला पार करावा लागतो. हेळंब - धनेगाव दळणवळणही बंद होणार आहे. सद्यस्थितीला पाणीपातळी कमी केल्यास उर्वरित पुलाचे काम पूर्ण होऊ शकते, असे धनेगावचे उपसरपंच कुमार पाटील, हेळंबचे सरपंच गोरख सावंत यांनी सांगितले.