शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

१९ दिवसांत अहमदपूर आगारास मिळाले ११ लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:31 IST

अहमदपूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आल्याने एसटी महामंडळाच्या आंतरजिल्हा व लांब पल्ल्याच्या बसेस १९ दिवसांपासून ...

अहमदपूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आल्याने एसटी महामंडळाच्या आंतरजिल्हा व लांब पल्ल्याच्या बसेस १९ दिवसांपासून जागेवरच आहेत. या कालावधीत अहमदपूर आगाराच्या बसेसच्या ५७९ फेऱ्या झाल्या असून, त्यातून केवळ ११ लाख ४३ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. बससेवा ठप्प झाल्याने आगारास १ कोटी ४० लाखांच्या उत्पन्नावर पाणी सोडवावे लागले आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने राज्य शासनाने कडक नियम लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी बससेवा सुरु असली तरी ती अल्प प्रमाणात आहे. परिणामी, जवळपास १९ दिवसांपासून बसेस बंद आहेत. शासनाने जिल्ह्याअंतर्गत बससेवा सुरु करण्यास मुभा दिली असली तरी प्रवासी मिळत नसल्याने येथील आगारातून केवळ लातूर आणि उदगीरसाठी बस सुरु आहे.

सध्या जिल्हा ते तालुका अशी बससेवा सुरु आहे. त्यानुसार अहमदपूरहून लातूरसाठी ७, उदगीरसाठी ५ अशा एकूण १२ बसेस सुरु केल्या आहेत. प्रत्येक फेरीनंतर बसचे निर्जंतुकीकरण करण्यात येते. दररोज ४० फेऱ्या होत आहेत. १० एप्रिल ते २९ एप्रिल या कालावधीत अहमदपूर आगारातील बसेसच्या ५७९ फेऱ्या झाल्या असून, त्यातून केवळ ११ लाख ४३ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. आगाराचे १ कोटी ४० लाख उत्पन्न बुडाले आहे.

दररोज धावतात १२ बसेस...

अहमदपूर येथील आगारात ७८ बसेस आहेत. चालक- वाहकांसह अन्य कर्मचारी असे एकूण ४९० कर्मचारी आहेत. सध्या दररोज लातूरसाठी ७, उदगीरला ५ बसेस धावत आहेत. उर्वरित बस आगारातच उभ्या आहेत. सध्या सुरु असलेल्या बसेस रिकाम्या धावत आहेत. प्रवासी मिळत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. लांब पल्ल्याच्या बसेस बंद असल्याने आगारास जवळपास १ कोटी ४० लाखांचा फटका बसला आहे.

दुचाकींचा वापर वाढला...

संचारबंदी सुरू झाल्यापासून ग्रामीण भागात एकही बस धावली नाही. शिवाय, खासगी प्रवासी वाहतूकही बंद आहे. आता खरीप हंगामासाठी आम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत आहे. तसेच विविध शासकीय कामानिमित्ताने तालुकाच्या गावी जावे लागते. मात्र, बस नसल्याने अडचणी येत आहेत. बहुतांश वेळा दुचाकीचा वापर करावा लागत आहे, असे ग्रामीण भागातील प्रवाशांनी सांगितले.

राज्याअंतर्गत व आंतरराज्य, आंतरजिल्हा वाहतूक व्यवस्था बंद आहे. पूर्वी येथून दररोज २५० बसेस धावत होत्या. महामंडळाने आगारातील २१० फेऱ्या रद्द केल्या आहेत. लांब, मध्यम पल्ल्यासह ग्रामीण भागातील सर्व बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बसस्थानकात पूर्णपणे शुकशुकाट दिसून येत आहे, असे आगारप्रमुख एस. जी. सोनवणे म्हणाले.