शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

शंभर दिवसांच्या आतच जिल्ह्यातील नऊ कारखान्यांची धुराडी थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 13:39 IST

ऊस गळिताचे १८० ते विक्रमी २०० दिवसांचे हंगाम घेतल्याचा इतिहास नोंदविणाऱ्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांना या वर्षी शंभरी पार करतानाच तोंडाला फेस आला. शंभरीच्या टप्प्यावरच २२ पैकी नऊ कारखान्यांची धुराडी थंडावली आहेत.

ठळक मुद्देशंभर दिवसांच्या आतच जिल्ह्यातील नऊ कारखान्यांची धुराडी थंडावलीउर्वरित १३ कारखानेही पंधरा दिवसांच्या आत बंद होणार

कोल्हापूर : ऊस गळिताचे १८० ते विक्रमी २०० दिवसांचे हंगाम घेतल्याचा इतिहास नोंदविणाऱ्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांना या वर्षी शंभरी पार करतानाच तोंडाला फेस आला. शंभरीच्या टप्प्यावरच २२ पैकी नऊ कारखान्यांची धुराडी थंडावली आहेत.

उर्वरित १३ पैकी तीन-चार कारखान्यांचा अपवाद वगळता सर्व कारखाने या आठवडाभरातच हंगाम गुंडाळणार आहेत. यामुळे यंदा जेमतेम १२० दिवसांचाच हंगाम होणार आहे. एकरकमी ‘एफआरपी’वरून शेतकरी संघटनेचा दबाव आणि साखर उद्योगाविषयीचा सरकारचा धोरणलकवा यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासून सुरू असलेला अडचणीचा डोंगर सांगतेलाही कायम राहिला आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील ‘दौलत’ वगळता उर्वरित २२ कारखान्यांनी यंदा गळीत हंगाम घेतला. साधारपणे १२ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत कारखान्यांनी प्रत्यक्षात गाळपास सुरुवात केली. दरम्यान प्रतिदिन गाळपक्षमता वाढली तरी आंदोलनामुळे कारखान्यांचे गाळप मधले काही दिवस बंद ठेवावे लागले. तरीही त्यानंतर वेग घेत कारखान्यांनी हंगाम रेटत आणला.गेल्या वर्षी शाहू, जवाहर, गुरुदत्त, दत्त-शिरोळ या कारखान्यांचे हंगाम २ ते २४ एप्रिल या कालावधीत संपले होते. उर्वरित कारखाने ८ ते २५ मार्च या कालावधीत संपले होते. यावर्षी पंचगंगा हा एकमेव कारखाना २५ मार्चपर्यंत चालणार आहे. उर्वरित दत्त- शिरोळ, जवाहर, गुरुदत्त, शाहू, वारणा, बिद्री, शरद, मंडलिक, दालमिया हे प्रमुख कारखानेदेखील १५ दिवसांतच हंगाम गुंडाळणार आहेत.

...म्हणून हंगाम लवकर आटोपलाया वर्षी जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरपेक्षाही जास्त क्षेत्रावरील ऊस गाळपासाठी उपलब्ध होता; पण जून ते आॅगस्ट या तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे उसाची वाढ खुंटली. परिणामी उसाचे क्षेत्र वाढूनही एकरी उतारा निम्म्यापेक्षाही कमी झाला. गाळपासाठी गुणवत्तेचा ऊसच उपलब्ध नसल्याने गाळपाचा हंगाम लवकर आटोपला आहे.

साधारपणे किमान १६० दिवस हंगाम चालला तरच साखर कारखान्यांना फायदा मिळतो. यापेक्षा कमी दिवस हंगामाचे झाले तर उत्पन्न तर कमी मिळतेच; शिवाय देखभालीचा खर्चही अंगावर पडत असल्याने साखर उद्योगाच्या तोट्यात भरच पडते. आजच्या घडीला एकरकमी एफआरपी देण्याचीही क्षमता कारखान्यांकडे राहिलेली नाही. सरकारने मदतीसाठी आधीच हात वर केले आहेत. त्यामुळे हंगाम संपला तरी एफआरपीचा तिढा कायम राहणार आहे.

आजअखेर बंद झालेले कारखानेभोगावती, राजाराम, गडहिंग्लज, आजरा, डी. वाय. पाटील, अथणी शुगर्स, हेमरस, महाडिक शुगर्स. 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर