शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
4
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
5
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
6
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
7
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
8
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
9
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
10
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
11
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
12
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
13
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
14
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
15
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
16
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
17
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
18
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
19
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
20
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

शंभर दिवसांच्या आतच जिल्ह्यातील नऊ कारखान्यांची धुराडी थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 13:39 IST

ऊस गळिताचे १८० ते विक्रमी २०० दिवसांचे हंगाम घेतल्याचा इतिहास नोंदविणाऱ्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांना या वर्षी शंभरी पार करतानाच तोंडाला फेस आला. शंभरीच्या टप्प्यावरच २२ पैकी नऊ कारखान्यांची धुराडी थंडावली आहेत.

ठळक मुद्देशंभर दिवसांच्या आतच जिल्ह्यातील नऊ कारखान्यांची धुराडी थंडावलीउर्वरित १३ कारखानेही पंधरा दिवसांच्या आत बंद होणार

कोल्हापूर : ऊस गळिताचे १८० ते विक्रमी २०० दिवसांचे हंगाम घेतल्याचा इतिहास नोंदविणाऱ्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांना या वर्षी शंभरी पार करतानाच तोंडाला फेस आला. शंभरीच्या टप्प्यावरच २२ पैकी नऊ कारखान्यांची धुराडी थंडावली आहेत.

उर्वरित १३ पैकी तीन-चार कारखान्यांचा अपवाद वगळता सर्व कारखाने या आठवडाभरातच हंगाम गुंडाळणार आहेत. यामुळे यंदा जेमतेम १२० दिवसांचाच हंगाम होणार आहे. एकरकमी ‘एफआरपी’वरून शेतकरी संघटनेचा दबाव आणि साखर उद्योगाविषयीचा सरकारचा धोरणलकवा यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासून सुरू असलेला अडचणीचा डोंगर सांगतेलाही कायम राहिला आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील ‘दौलत’ वगळता उर्वरित २२ कारखान्यांनी यंदा गळीत हंगाम घेतला. साधारपणे १२ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत कारखान्यांनी प्रत्यक्षात गाळपास सुरुवात केली. दरम्यान प्रतिदिन गाळपक्षमता वाढली तरी आंदोलनामुळे कारखान्यांचे गाळप मधले काही दिवस बंद ठेवावे लागले. तरीही त्यानंतर वेग घेत कारखान्यांनी हंगाम रेटत आणला.गेल्या वर्षी शाहू, जवाहर, गुरुदत्त, दत्त-शिरोळ या कारखान्यांचे हंगाम २ ते २४ एप्रिल या कालावधीत संपले होते. उर्वरित कारखाने ८ ते २५ मार्च या कालावधीत संपले होते. यावर्षी पंचगंगा हा एकमेव कारखाना २५ मार्चपर्यंत चालणार आहे. उर्वरित दत्त- शिरोळ, जवाहर, गुरुदत्त, शाहू, वारणा, बिद्री, शरद, मंडलिक, दालमिया हे प्रमुख कारखानेदेखील १५ दिवसांतच हंगाम गुंडाळणार आहेत.

...म्हणून हंगाम लवकर आटोपलाया वर्षी जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरपेक्षाही जास्त क्षेत्रावरील ऊस गाळपासाठी उपलब्ध होता; पण जून ते आॅगस्ट या तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे उसाची वाढ खुंटली. परिणामी उसाचे क्षेत्र वाढूनही एकरी उतारा निम्म्यापेक्षाही कमी झाला. गाळपासाठी गुणवत्तेचा ऊसच उपलब्ध नसल्याने गाळपाचा हंगाम लवकर आटोपला आहे.

साधारपणे किमान १६० दिवस हंगाम चालला तरच साखर कारखान्यांना फायदा मिळतो. यापेक्षा कमी दिवस हंगामाचे झाले तर उत्पन्न तर कमी मिळतेच; शिवाय देखभालीचा खर्चही अंगावर पडत असल्याने साखर उद्योगाच्या तोट्यात भरच पडते. आजच्या घडीला एकरकमी एफआरपी देण्याचीही क्षमता कारखान्यांकडे राहिलेली नाही. सरकारने मदतीसाठी आधीच हात वर केले आहेत. त्यामुळे हंगाम संपला तरी एफआरपीचा तिढा कायम राहणार आहे.

आजअखेर बंद झालेले कारखानेभोगावती, राजाराम, गडहिंग्लज, आजरा, डी. वाय. पाटील, अथणी शुगर्स, हेमरस, महाडिक शुगर्स. 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर