शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
16
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
17
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
18
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
19
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
20
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

शंभर दिवसांच्या आतच जिल्ह्यातील नऊ कारखान्यांची धुराडी थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 13:39 IST

ऊस गळिताचे १८० ते विक्रमी २०० दिवसांचे हंगाम घेतल्याचा इतिहास नोंदविणाऱ्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांना या वर्षी शंभरी पार करतानाच तोंडाला फेस आला. शंभरीच्या टप्प्यावरच २२ पैकी नऊ कारखान्यांची धुराडी थंडावली आहेत.

ठळक मुद्देशंभर दिवसांच्या आतच जिल्ह्यातील नऊ कारखान्यांची धुराडी थंडावलीउर्वरित १३ कारखानेही पंधरा दिवसांच्या आत बंद होणार

कोल्हापूर : ऊस गळिताचे १८० ते विक्रमी २०० दिवसांचे हंगाम घेतल्याचा इतिहास नोंदविणाऱ्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांना या वर्षी शंभरी पार करतानाच तोंडाला फेस आला. शंभरीच्या टप्प्यावरच २२ पैकी नऊ कारखान्यांची धुराडी थंडावली आहेत.

उर्वरित १३ पैकी तीन-चार कारखान्यांचा अपवाद वगळता सर्व कारखाने या आठवडाभरातच हंगाम गुंडाळणार आहेत. यामुळे यंदा जेमतेम १२० दिवसांचाच हंगाम होणार आहे. एकरकमी ‘एफआरपी’वरून शेतकरी संघटनेचा दबाव आणि साखर उद्योगाविषयीचा सरकारचा धोरणलकवा यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासून सुरू असलेला अडचणीचा डोंगर सांगतेलाही कायम राहिला आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील ‘दौलत’ वगळता उर्वरित २२ कारखान्यांनी यंदा गळीत हंगाम घेतला. साधारपणे १२ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत कारखान्यांनी प्रत्यक्षात गाळपास सुरुवात केली. दरम्यान प्रतिदिन गाळपक्षमता वाढली तरी आंदोलनामुळे कारखान्यांचे गाळप मधले काही दिवस बंद ठेवावे लागले. तरीही त्यानंतर वेग घेत कारखान्यांनी हंगाम रेटत आणला.गेल्या वर्षी शाहू, जवाहर, गुरुदत्त, दत्त-शिरोळ या कारखान्यांचे हंगाम २ ते २४ एप्रिल या कालावधीत संपले होते. उर्वरित कारखाने ८ ते २५ मार्च या कालावधीत संपले होते. यावर्षी पंचगंगा हा एकमेव कारखाना २५ मार्चपर्यंत चालणार आहे. उर्वरित दत्त- शिरोळ, जवाहर, गुरुदत्त, शाहू, वारणा, बिद्री, शरद, मंडलिक, दालमिया हे प्रमुख कारखानेदेखील १५ दिवसांतच हंगाम गुंडाळणार आहेत.

...म्हणून हंगाम लवकर आटोपलाया वर्षी जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरपेक्षाही जास्त क्षेत्रावरील ऊस गाळपासाठी उपलब्ध होता; पण जून ते आॅगस्ट या तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे उसाची वाढ खुंटली. परिणामी उसाचे क्षेत्र वाढूनही एकरी उतारा निम्म्यापेक्षाही कमी झाला. गाळपासाठी गुणवत्तेचा ऊसच उपलब्ध नसल्याने गाळपाचा हंगाम लवकर आटोपला आहे.

साधारपणे किमान १६० दिवस हंगाम चालला तरच साखर कारखान्यांना फायदा मिळतो. यापेक्षा कमी दिवस हंगामाचे झाले तर उत्पन्न तर कमी मिळतेच; शिवाय देखभालीचा खर्चही अंगावर पडत असल्याने साखर उद्योगाच्या तोट्यात भरच पडते. आजच्या घडीला एकरकमी एफआरपी देण्याचीही क्षमता कारखान्यांकडे राहिलेली नाही. सरकारने मदतीसाठी आधीच हात वर केले आहेत. त्यामुळे हंगाम संपला तरी एफआरपीचा तिढा कायम राहणार आहे.

आजअखेर बंद झालेले कारखानेभोगावती, राजाराम, गडहिंग्लज, आजरा, डी. वाय. पाटील, अथणी शुगर्स, हेमरस, महाडिक शुगर्स. 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर