शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी असूनही शिवसेनेला सवतीची वागणूक का..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:28 IST

कोल्हापूर : राज्यात महाविकास आघाडीतील शिवसेना हा प्रमुख पक्ष आहे, मुख्यमंत्री आमचे असतानाही कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात मात्र शिवसेनेला तिन्ही ...

कोल्हापूर : राज्यात महाविकास आघाडीतील शिवसेना हा प्रमुख पक्ष आहे, मुख्यमंत्री आमचे असतानाही कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात मात्र शिवसेनेला तिन्ही मंत्र्यांकडून सवतीची भूमिका का दिली जाते अशी रोखठोक विचारणा गुरुवारी संपर्क नेते दिवाकर रावते व संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी केली. त्यावरून महाविकास आघाडीतील तीन पक्षांतील खदखद व्यक्त झाली. पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीच आता ही खदखद दूर करण्याची गरज आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन दोन वर्षे झाली आहेत. मुख्यमंत्री शिवसेनेचे असले तरी जिल्ह्यातील सत्तेवर मात्र दोन्ही काँग्रेसचीच छाप आहे. जिल्हा प्रशासनापासून जनतेपर्यंत लोकांना ती छाप जाणवते. त्यात मंत्री सतेज पाटील व मुश्रीफ यांचा काम करण्याचा धडाका हे देखील एक कारण आहे. जिल्ह्यात शिवसेनेकडे एकमुखी नेतृत्व नाही. त्यामुळे सत्ता राबवताना मर्यादा येतात. त्याचाही फटका पक्षाला बसत असल्याचे चित्र दिसते. रावते यांनी या सर्व तक्रारी पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालण्यात येतील असे सांगितले आहे.

खदखद अशी..

१.महाविकास आघाडीचे सरकार असताना जे शासकीय कार्यक्रम होतात, त्यास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून सतेज पाटील व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांना सन्मानाने निमंत्रण असते. त्यांना समारंभात सन्मान दिला जातो मग हेच शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांच्या बाबतीत का होत नाही..? आम्ही काय सवतीची मुले आहोत का..? जिल्हा परिषदेच्या वतीने झालेल्या यशवंतराव चव्हाण पुतळा अनावरण समारंभात हा वेदनादायी अनुभव शिवसेनेला आला होता. आमचे ११ सदस्य आणि तीन सभापती असतानाही साधे निमंत्रण पत्रिकेत आमचे नाव येत नसेल तर कितीकाळ गप्प बसायचे..? सरकार तीन पक्षांचे असेल तर तिन्ही पक्षांच्या नेत्यांना सारखीच वागणूक मिळाली पाहिजे.

२. ग्रामविकास मंत्री हे स्वत: हसन मुश्रीफ असतानाही २५ : १५ च्या निधीतील एक रुपयाही ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना देत नाहीत. त्याउलट दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मात्र हा निधी मिळतो असा भेदभाव का केला जातो..?

३. मंत्री मुश्रीफ यांनी शिवसेनेच्या दोन्ही खासदारांना ५ कोटींचा निधी दिला परंतु चार पराभूत आमदारांना मात्र एकही रुपया त्यांनी दिलेला नाही. त्यांनी विकासकामे कशी करायची..? आमचे सरकार आले म्हणून आम्ही नुसतेच लोकांना सांगायचे का..?

४. जिल्हास्तरावरील ज्या विविध शासकीय समित्या नेमल्या जातात त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेला ६०: २०:२० असे सदस्य निवडीचे प्रमाण आहे. जे २० टक्के सदस्य शिवसेनेच्या वाट्याला येतील त्याची नावेही पालकमंत्री पाटील स्वत:च ठरवणार असतील तर त्यांना हा अधिकार कुणी दिला अशी विचारणा नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली आहे. ही नावे आम्ही ठरवू व त्यांनाच या समित्यांवर संधी मिळाली पाहिजे.

५.आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर हे अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेच्या कोट्यातूनच ते राज्यमंत्री झाले आहेत; परंतु त्यांना शिवसेनेपेक्षा जास्त प्रेम राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याकडून सन्मान व न्याय मिळत नाही. त्याबाबत त्यांना सूचना देण्याची गरज आहे. (यड्रावकर शिवसेनेतच आहेत परंतु स्थानिक पातळीवर शिवसेनेचेच माजी आमदार उल्हास पाटील गट त्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे या गटाला त्यांच्याकडून सहकार्य मिळत नाही अशी त्यातील मेख.)