Satej Patil : कोल्हापूरात सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यातील राजकारणाची जोरदार चर्चा असते. आधी हे दोन नेते जवळचे मित्र होते, पुढे राजकारणातून या दोन मित्रांमध्ये वाद सुरू झाले. धनंजय महाडिकांमध्ये वाद कधीपासून सुरू झाला यावर आता आमदार सतेज पाटील यांनी'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीच्या विशेष मुलाखतीमध्ये किस्सा सांगितला.
“शहराची अवस्था समजून घ्या, मुंबईत बिहार भवन बांधायचे असेल तर…”; संजय राऊतांनी ठेवली मोठी अट
"२०१४ साली आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी म्हणून निवडणुकीला सामोर गेलो. पवार साहेबांच्या आदेशावरून तो वाद मिटला होता. आम्ही एक दिलाने त्या निवडणुकीमध्ये त्यांना मदत केली. ते खासदार झाले आणि ऑक्टोबरला त्यांनी त्यांच्या भावाला माझ्या विरोधात उभे केले.त्यावेळी धनंजय महाडिकांनी 'काका माझं ऐकत नाहीत' असे कारण दिले. तिथून आमच्यात वाद सुरू झाला, असंही सतेज पाटील म्हणाले.
आमच्यात पॉलिटिकल वाद आहे. मी त्यांना महत्त्व देत नाही, माझा अजेंडा कोल्हापूरच्या विकासाचा आहे. मी टीका करून त्यांना तेवढा टीआरपी द्यायची आवश्यकता नाही. राजकारणात आता यापुढे कधी त्यांची संगत नाही हा निर्णय माझा पक्का आहे, असंही सतेज पाटील म्हणाले.