शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

इचलकरंजी-सांगली रस्त्यावर प्रवास कोण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 12:18 AM

पावसाळा सुरू झाल्याने रस्ता होणे शक्य नसल्याने आणखीन किती दिवस हा धोकादायक प्रवास सहन करायचा, असे म्हणत वाहनधारकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देअपघात घडूनही वाहनचालक दररोजचा करतात धोकादायक प्रवास दुर्गम ग्रामीण भागातील रस्त्याप्रमाणे स्वरूप

इचलकरंजी : येथील सांगली रोडची दुरवस्था पाहता दुर्गम ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर जाण्यासाठीचा मार्ग असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. भुयारी गटार योजनेच्या खुदाईमुळे या मुख्य रस्त्याची वाताहात झाली आहे. मोटारसायकली घसरून पडणे, यासह किरकोळ अपघात नित्याचेच बनले आहेत. पावसाळा सुरू झाल्याने रस्ता होणे शक्य नसल्याने आणखीन किती दिवस हा धोकादायक प्रवास सहन करायचा, असे म्हणत वाहनधारकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

इचलकरंजी-सांगली-मिरज-जयसिंगपूरकडे जाणारा हा मुख्य मार्ग आहे. त्याचबरोबर या मार्गावर मोठमोठे शाळा, कॉलेज, अभियांत्रिकी विद्यालये, मल्टिप्लेक्स, मॉल, हॉटेल, विविध कंपनीच्या गाड्यांचे शोरूम असल्याने नेहमीच मोठी वर्दळ असते. नगरपालिकेच्यावतीने गेल्या वर्षभरापासून भुयारी गटार योजना राबविण्यासाठी या रस्त्याची मोठ्या प्रमाणात खुदाई सुरू केली आहे. त्यामुळे रस्त्याची चाळण होऊन पूर्ण रस्ता खराब झाला आहे. खुदाई केलेली माती रस्त्यावर पसरून निसरडे निर्माण झाल्याने अनेक वाहनधारक यावरून घसरून पडून जखमी झाले आहेत.

गेल्या पावसाळ्यामध्येही अशीच परिस्थिती कायम आहे. अनेकजण या रस्त्यावर घसरून पडत आहेत. त्याचबरोबर मोठी खुदाई केली असतानाही त्याबाबत सूचना अथवा काळजी न घेतल्याने काहीजण खड्ड्यांमध्ये जाऊन पडले आहेत. वारंवार घडणाऱ्या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांनी अनेकवेळा आंदोलने केली, नगरपालिकेकडे तक्रारी केल्या, सोशल मीडियावर वारंवार टीकाही केली जाते. तरीही हे काम म्हणावे तशा गतीने पूर्ण होताना दिसत नाही.जीव मुठीत घेऊन करावे लागणार मार्गक्रमणपावसाळा सुरू झाल्याने नियमानुसार रस्त्याचे काम करता येणारनाही, त्यामुळे नागरिकांना दिवाळीपर्यंत जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरूनच मार्गक्रमण करावे लागणार आहे. परिणामी संतप्त नागरिकांच्या तीव्र भावनांना नगरपालिकेलाही सामोरे जावे लागणार आहे.वारंवारच्या खुदाईमुळे रस्ता कमकुवतभुयारी गटार योजनेच्या पूर्वी पाईपलाईनसाठीही या मार्गावर खुदाई करण्यात आली होती. वारंवारच्या खुदाईमुळे हा रस्ता कमकुवत झाला असून, शासनाने नव्याने रस्ता करताना गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन चांगला दर्जेदार रस्ता करणे गरजेचे आहे.

सद्य:स्थितीत हा रस्ता म्हणजे ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर जाणारा किंवा पाणंद रस्ता असल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे. नाइलाजास्तव अनेकजण धोका पत्करून या रस्त्यावर मार्गक्रमण करीत आहेत.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरroad safetyरस्ते सुरक्षा