शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
5
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
6
Top Marathi News Live: नाशिक: भोंदू अशोक खरातविरुद्ध SITकडून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
7
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
8
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
9
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
10
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
11
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
13
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
14
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
15
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
16
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
19
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
20
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
Daily Top 2Weekly Top 5

मायबाप सरकार बांधावर कधी येणार, शेतकऱ्यांची आर्त हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 14:29 IST

महापूर, अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी अगोदरच आर्थिक अरिष्टात सापडला असताना परतीच्या पावसाने त्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे. महापुरातील नुकसानभरपाई अद्याप सरकारच्या तिजोरीत असल्याने परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई कधी मिळणार? मायबाप सरकार पंचनाम्यासाठी बांधावर कधी येणार? पिके काढायची की पंचनाम्यासाठी तशीच ठेवायची? या चिंतेत शेतकरी आहे.

ठळक मुद्देमायबाप सरकार बांधावर कधी येणार, शेतकऱ्यांची आर्त हाकपिके काढायची की तशीच ठेवायची?

राजाराम लोंढे

कोल्हापूर : महापूर, अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी अगोदरच आर्थिक अरिष्टात सापडला असताना परतीच्या पावसाने त्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे. महापुरातील नुकसानभरपाई अद्याप सरकारच्या तिजोरीत असल्याने परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई कधी मिळणार? मायबाप सरकार पंचनाम्यासाठी बांधावर कधी येणार? पिके काढायची की पंचनाम्यासाठी तशीच ठेवायची? या चिंतेत शेतकरी आहे.

साधारणत: कोल्हापूर जिल्ह्यात आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत परतीच्या पावसाचा मुक्काम असतो. पडेल तिथेच पडेल, त्यात सातत्य नसायचे. त्यामुळे आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत खरिपाची काढणी होऊन रब्बीच्या पेरण्या सुरू होतात; पण यंंदा नोव्हेंबर उजाडला तरी पाऊस पाठ सोडत नाही.

आॅक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून खरीप काढणीसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे; पण एकसारखा पाऊस तोही ढगफुटी झाल्याने खरीप काढणीचे धाडस होत नाही. जोरदार पावसाने उभी पिके जमीनदोस्त झाली आहेत. पिकांवर पाणी उभा राहिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

महापूर व अतिवृष्टीने पिके गेली. त्यातून राहिलेली पिके परतीच्या पावसाने गेली. महापुरात बाधित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा सरकारने केली; पण अद्याप याद्यांचा घोळच सुरू आहे. महापूर ओसरून तीन महिने झाले तरी कर्जमाफी याद्यांतच अडकल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा वाढत आहे.

ऊसपीक महापुरात गेले, भात, सोयाबीन परतीच्या पावसाने घालविल्याने आता जगायचं कसं? या प्रश्नाने शेतकरी चिंतेत आहे. गेले दोन-तीन दिवस पावसाने काहीशी उसंत घेतल्याने उरली-सुरली पिके काढणीसाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे.

काढणीपूर्वी पाहणी करून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करणे अपेक्षित होते; पण कृषी व महसूल विभागाची यंत्रणा अद्याप थंडच आहे. कुजलेली पिके काढायची की पंचनाम्याची वाट पाहत तशीच ठेवायची? मायबाप सरकार आमच्या बांधावर येणार तरी कधी? या विवंचनेत शेतकरी आहे.

अस्मानी संकट पहिल्यांदाच

शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटे नवीन नाहीत; पण महापूर, अतिवृष्टी आणि परतीचा पाऊस अशी एकामागून एक अस्मानी संकटे पहिल्यांदाच आली. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारच्या मदतीची गरज आहे; पण सरकारी यंत्रणेची गती पाहता तातडीने मदत मिळणे कठीण वाटते.


शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना सरकारी यंत्रणा सुस्तच आहे. पंचनामा होत नसल्याने पिके काढायची की नाही? हेच कळत नाही. राज्यकर्त्यांनी बांधावर जाऊन पाहणी करण्यापेक्षा तातडीने पंचनामे करून मदत द्यावी.
- माणिक शिंदे ,शेतकरी, शिये

 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसkolhapurकोल्हापूर