शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Kolhapur: चिमगाव विषबाधा प्रकरण: केकमुळे नाही, मग कशामुळे?; फॉरेन्सिकच्या अहवालाकडे नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 13:14 IST

अन्न व औषध प्रशासनाचा अहवाल प्राप्त

कोल्हापूर : कागल तालुक्यातील चिमगाव येथे विषबाधेमुळे दगावलेल्या भावंडांना नेमकी कशातून विषबाधा झाली? याचा उलगडा अद्याप झालेला नाही. मुदत संपलेल्या केकमधून विषबाधा झाल्याची चर्चा सुरुवातीला होती. पण, अन्न व औषध प्रशासनाने केकचे कारण नसल्याचे स्पष्ट केले. दोघांच्या पोटात तणनाशकाचे अंश मिळाले नाहीत, असा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे नेमकी कशातून विषबाधा झाली, याचे उत्तर व्हिसेरा आणि फॉरेन्सिक लॅबच्या अहवालातूनच मिळणार आहे.एक डिसेंबरला जेवणातून झालेल्या विषबाधेमुळे श्रीयांश आणि काव्या आंगज या भावंडांचा उपचारादरम्यान तीन डिसेंबरला मृत्यू झाला. सख्ख्या भावंडांच्या मृत्यूने संपूर्ण जिल्हा हळहळला होता. मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणलेल्या कपकेकमधून विषबाधा झाली असावी, अशी चर्चा सुरुवातीला होती. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने आंगज यांच्या घरात जाऊन कपकेकच्या पाकिटाचा कागद ताब्यात घेतला.संबंधित केक तयार केलेल्या बेकरीत जाऊन चौकशी केली. त्याच बॅचमधील विक्री झालेल्या इतर पाकिटांचा शोध घेऊन तपासणी केली. त्याची मुदतही संपलेली नव्हती. तसेच केक खाल्लेल्या इतर कुणालाही त्रास झाला नव्हता. त्यामुळे आंगज भावंडांना कपकेकमुळे विषबाधा झाली नसल्याचे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. याबाबतचे निवेदनही त्यांनी प्रसिद्धीस दिले. कपकेक हे विषबाधेचे कारण नसल्याचे स्पष्ट झाल्याने आता अन्य कारणांचा शोध घेणे गरजेचे बनले आहे.मुलांनी काय खाल्ले होते?एक ते तीन डिसेंबरला मुलांनी घरात चपाती, भाकरी, मटण, आंबोळी, दूध, कपकेक, झुणका-भाकरी, भात असे पदार्थ खाल्ले होते. दोन तारखेला सकाळी मुलाला त्रास होऊ लागला. गावातील डॉक्टरांनी त्याला औषधे देऊन घरी पाठवले. दुसऱ्या दिवशी त्याची प्रकृती अचानक खालावली आणि मुलीलाही त्रास सुरू झाला. दरम्यान, त्यांच्या आईलाही थोडासा त्रास झाला. बाहेरून कोणत्याही प्रकारचे विष त्यांच्या पोटात गेले नसेल तर भिन्न प्रकृतीच्या खाद्यपदार्थांमुळे त्यांच्या पोटात विष तयार झाले असावे काय? याला उलगडा पोलिसांना करावा लागणार आहे.

निदान होण्यास विलंबश्रीयांश याला त्रास सुरू झाल्यानंतर सुरुवातीला गावातील डॉक्टरांकडे उपचार घेतले. त्यांनी मुलाच्या खाण्या-पिण्याची सविस्तर माहिती घेऊन पुढील उपचारासाठी तज्ज्ञांकडे पाठवले असते, तर कदाचित वेळेत निदान आणि उपचार होऊ शकले असते. काव्याला त्रास होत असताना श्रीयांशला आणलेले तेच औषध तिलाही दिले गेले. त्यामुळे दोघांनाही वेळेत आणि आवश्यक उपचार मिळाले नाहीत, असा पोलिसांचा अंदाज आहे.अहवालांची प्रतीक्षाश्रीयांशचा दफन केलेला मृतदेह बाहेर काढून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोस्टमॉर्टेम करण्यात आले होते. श्रीयांशसह काव्याचाही व्हिसेरा राखीव ठेवला आहे. दोघांच्याही पोटातील काही अंश तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले आहेत. १० ते १२ दिवसांत दोन्ही अहवाल येणे अपेक्षित आहे. त्यानंतरच विषबाधेचा उलगडा होईल, अशी माहिती मुरगूड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी करे यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfood poisoningअन्नातून विषबाधाDeathमृत्यू