शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Kolhapur: चिमगाव विषबाधा प्रकरण: केकमुळे नाही, मग कशामुळे?; फॉरेन्सिकच्या अहवालाकडे नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 13:14 IST

अन्न व औषध प्रशासनाचा अहवाल प्राप्त

कोल्हापूर : कागल तालुक्यातील चिमगाव येथे विषबाधेमुळे दगावलेल्या भावंडांना नेमकी कशातून विषबाधा झाली? याचा उलगडा अद्याप झालेला नाही. मुदत संपलेल्या केकमधून विषबाधा झाल्याची चर्चा सुरुवातीला होती. पण, अन्न व औषध प्रशासनाने केकचे कारण नसल्याचे स्पष्ट केले. दोघांच्या पोटात तणनाशकाचे अंश मिळाले नाहीत, असा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे नेमकी कशातून विषबाधा झाली, याचे उत्तर व्हिसेरा आणि फॉरेन्सिक लॅबच्या अहवालातूनच मिळणार आहे.एक डिसेंबरला जेवणातून झालेल्या विषबाधेमुळे श्रीयांश आणि काव्या आंगज या भावंडांचा उपचारादरम्यान तीन डिसेंबरला मृत्यू झाला. सख्ख्या भावंडांच्या मृत्यूने संपूर्ण जिल्हा हळहळला होता. मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणलेल्या कपकेकमधून विषबाधा झाली असावी, अशी चर्चा सुरुवातीला होती. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने आंगज यांच्या घरात जाऊन कपकेकच्या पाकिटाचा कागद ताब्यात घेतला.संबंधित केक तयार केलेल्या बेकरीत जाऊन चौकशी केली. त्याच बॅचमधील विक्री झालेल्या इतर पाकिटांचा शोध घेऊन तपासणी केली. त्याची मुदतही संपलेली नव्हती. तसेच केक खाल्लेल्या इतर कुणालाही त्रास झाला नव्हता. त्यामुळे आंगज भावंडांना कपकेकमुळे विषबाधा झाली नसल्याचे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. याबाबतचे निवेदनही त्यांनी प्रसिद्धीस दिले. कपकेक हे विषबाधेचे कारण नसल्याचे स्पष्ट झाल्याने आता अन्य कारणांचा शोध घेणे गरजेचे बनले आहे.मुलांनी काय खाल्ले होते?एक ते तीन डिसेंबरला मुलांनी घरात चपाती, भाकरी, मटण, आंबोळी, दूध, कपकेक, झुणका-भाकरी, भात असे पदार्थ खाल्ले होते. दोन तारखेला सकाळी मुलाला त्रास होऊ लागला. गावातील डॉक्टरांनी त्याला औषधे देऊन घरी पाठवले. दुसऱ्या दिवशी त्याची प्रकृती अचानक खालावली आणि मुलीलाही त्रास सुरू झाला. दरम्यान, त्यांच्या आईलाही थोडासा त्रास झाला. बाहेरून कोणत्याही प्रकारचे विष त्यांच्या पोटात गेले नसेल तर भिन्न प्रकृतीच्या खाद्यपदार्थांमुळे त्यांच्या पोटात विष तयार झाले असावे काय? याला उलगडा पोलिसांना करावा लागणार आहे.

निदान होण्यास विलंबश्रीयांश याला त्रास सुरू झाल्यानंतर सुरुवातीला गावातील डॉक्टरांकडे उपचार घेतले. त्यांनी मुलाच्या खाण्या-पिण्याची सविस्तर माहिती घेऊन पुढील उपचारासाठी तज्ज्ञांकडे पाठवले असते, तर कदाचित वेळेत निदान आणि उपचार होऊ शकले असते. काव्याला त्रास होत असताना श्रीयांशला आणलेले तेच औषध तिलाही दिले गेले. त्यामुळे दोघांनाही वेळेत आणि आवश्यक उपचार मिळाले नाहीत, असा पोलिसांचा अंदाज आहे.अहवालांची प्रतीक्षाश्रीयांशचा दफन केलेला मृतदेह बाहेर काढून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोस्टमॉर्टेम करण्यात आले होते. श्रीयांशसह काव्याचाही व्हिसेरा राखीव ठेवला आहे. दोघांच्याही पोटातील काही अंश तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले आहेत. १० ते १२ दिवसांत दोन्ही अहवाल येणे अपेक्षित आहे. त्यानंतरच विषबाधेचा उलगडा होईल, अशी माहिती मुरगूड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी करे यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfood poisoningअन्नातून विषबाधाDeathमृत्यू