शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

‘आमचं ठरलंय’ आता प्राधिकरण नकोच, ४० गावांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 2:51 PM

त्रासदायक ठरत असल्याचे स्पष्ट करत कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण रद्द करण्याचा निर्धार विविध ४० गावांनी केला. आता प्राधिकरण नकोच असं ‘आमचं ठरलंय’. आमचा उद्रेक होण्याची वाट सरकारने पाहू नये, असा इशारा या गावांमधील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि प्रतिनिधींनी दिला

ठळक मुद्दे‘आमचं ठरलंय’ आता प्राधिकरण नकोच ४० गावांचा निर्धार; उद्रेक होण्याची वाट पाहू नका

कोल्हापूर : त्रासदायक ठरत असल्याचे स्पष्ट करत कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण रद्द करण्याचा निर्धार विविध ४० गावांनी केला. आता प्राधिकरण नकोच असं ‘आमचं ठरलंय’. आमचा उद्रेक होण्याची वाट सरकारने पाहू नये, असा इशारा या गावांमधील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि प्रतिनिधींनी दिला.येथील अजिंक्यतारा कार्यालयात आमदार सतेज पाटील यांनी प्राधिकरणामध्ये समाविष्ट असणाऱ्या गावांच्या अडचणी समजून घेण्यासाठी बैठक घेतली.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत म्हणाले, ‘प्राधिकरणातील गावांची स्थिती बिकट आहे. आमचा उद्रेक होण्याची वाट सरकारने पाहू नये.’ वडणगेचे सरपंच सचिन चौगुले म्हणाले, प्राधिकरणाबाबत पालकमंत्र्यांनी दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता अद्याप झालेली नाही. पाचगावचे संग्राम पाटील म्हणाले, बांधकाम परवाने कमी खर्चात, वेळेत देण्याचा निर्णय लवकर व्हावा.

वाशीचे संदीप पाटील म्हणाले, पिंपरी-चिंचवड वगळता राज्यातील कोणतेही प्राधिकरण यशस्वी झालेले नाही; त्यामुळे आम्हाला प्राधिकरण नको. निगवेचे दिनकर आडसूळ म्हणाले, प्राधिकरणाने जमिनी घेतल्या, तर पिकवून काय खायचे हा प्रश्न आहे. नागरिक, शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणारे प्राधिकरण रद्द व्हावे.

शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे म्हणाले, विकास करण्याऐवजी त्रास होणार असेल, तर मग प्राधिकरण कशाला? आमच्या ग्रामपंचायती सक्षम आहेत. सध्या प्राधिकरण महापुरात वाहून गेल्यासारखी स्थिती आहे.या बैठकीत आमदार पाटील यांनी मार्गदर्शन केले. शरद निगडे, अशोक पाटील, अमर मोरे, आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिंगणापूरचे अर्जुन मस्कर, वळीवडेचे प्रकाश शिंदे, गडमुडशिंगीचे प्रदीप झांबरे, गोकुळ शिरगावचे सरपंच एम. के. पाटील, शंकरराव पाटील, सर्जेराव मिठारी, संदीप पाटील, के. पी. पाटील, साताप्पा कांबळे, उजळाईवाडीचे डी. जी. माने, काकासो पाटील, उत्तम आंबवडे, नंदकुमार मजगे, सुनील गुमाने, न्यू वाडदेचे दत्तात्रय पाटील, सचिन कुर्ले, चिंचवाडचे अनिल पाटील, गांधीनगरचे सेवाराम तलरेजा, मोरेवाडीच्या सुनंदा कुंभार, तामगावचे निवास जोंधळेकर, बालिंगा अतुल बोंद्रे, आदी उपस्थित होते.प्राधिकरणाविरोधातील गावेपाचगाव, शिंगणापूर, वळीवडे, कंदलगाव, निगवे दुमाला, न्यू वाडदे, उजळाईवाडी, पीरवाडी, नेर्ली, तामगाव, वडणगे, कळंबा, मोरेवाडी, बालिंगा, नागदेववाडी, गोकुळ शिरगाव, सरनोबतवाडी, टोप-संभापूर, आंबेवाडी, प्रयाग चिखली, उचगाव, शिरोली पुलाची, कणेरीवाडी, कणेरी, भुयेवाडी, पाडळी खुर्द , आदी गावांचा प्राधिकरणाला विरोध आहे. गांधीनगर, गडमुडशिंगी, चिंचवाड ग्रामपंचायतीतील काही सदस्यदेखील विरोधात आहेत.परवान्यांबाबत ग्रामपंचायतींना पत्रे द्यागावठाण हद्दीतील बांधकाम परवाने ग्रामपंचायतींकडून देण्याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते. मात्र, अद्याप त्याबाबत काहीच झालेले नाही. परवाने देण्याबाबतचे पत्र प्राधिकरणाने ग्रामपंचायतींना द्यावे, अशी मागणी नेर्लीचे प्रकाश पाटील यांनी केली.

प्राधिकरणाबाबत सरपंच, सदस्यांनी मांडलेल्या अडचणी१) गुंठेवारी झालेल्या प्लॉटवर बांधकाम परवाने व ग्रामपंचायतींना विकासात्मक कामांच्या मंजुरी मिळविणे कठीण झाले आहे.२) गावठाणमधील बांधकाम परवाना घेताना नगररचना कार्यालयाचा अभिप्राय घ्यावा लागतो. त्यास विलंब होत असल्याने लोकांना बँक कर्ज मिळविण्यात अडचण निर्माण होत आहे.३) ग्रामपंचायतींच्या अधिकारावर गदा आल्याने ग्रामपंचायतींच्या विकासाला मर्यादा आली आहे.४) प्राधिकरणाच्या बांधकाम शुल्काचा परिणाम ग्रामीण भागात इमारती बांधताना होत आहे; त्यामुळे नवे बांधकाम होण्यात अडथळे निर्माण होत आहेत. 

 

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर