शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

चांदोली धरणातून 3000 क्यूसेक'ने पाण्याचा विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 16:43 IST

धरणाचे चार दरवाजे 0.25 मीटर ने उचलून 3000 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु

मारुती गुरवशितूर: मागील पंधरा दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसापासून पुन्हा दमदार सुरुवात केली आहे. धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरु असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे चांदोली धरणात २८.७८ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. परिणामी धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज, दुपारी तीन वाजता वाजता पाटबंधारे विभागाचे विभागाचे उपविभागीय अभियंता किटवडकर, शाखाधिकारी गोरख पाटील यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते पाणीपूजन करून धरणाचे चार दरवाजे 0.25 मीटर ने उचलून 3000 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नदी पाणीपातळीत वाढ होवून पाणी पात्राबाहेर पडू शकते. आवश्यकतेनुसार धरणातून आणखी पाणी सोडावे लागणार आहे. सध्या धरण 80 टक्के भरले असून एकूण पाणीसाठा 28.78 टीएमसी आहे. पाण्याची आवक 10680 क्यूसेक इतकी आहे. पाणीपातळी 641.40 फूट इतकी झाली आहे.

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी पाऊस कमी झाला आहे. मात्र पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्याने धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने धरणातील पाण्याचा विसर्गही बंद करण्यात आला होता. मात्र पुन्हा पावसाची संततधार सुरु झाल्याने धरण पाणीसाठ्यात वाढ झाल्याने धरणातून पुन्हा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.चांदोली धरण पाणलोट परिसर हा पावसाचे आगार म्हणून ओळखला जातो. यावर्षी जुन महिन्यात पावसाने ओढ दिल्याने ३४. ४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणातील पाणीसाठा १० टीएमसी पर्यंत निच्चांकी खाली आला होता. परंतु जुलै महिन्याच्या सुरुवातीस पावसाने दमदार हजेरी लावल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत गेली. मात्र, पावसाने पुन्हा विश्रांती घेतल्याने या धरणातील पाण्याची आवक कमी झाली. यानंतर आता ऑगस्ट महिन्यात पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावल्याने धरण पाणीसाठ्यात वाढ झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSangliसांगलीRainपाऊसDamधरणWaterपाणी